महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसात पालिकेच्या दोन कामगारांचा मृत्यू, चौकशीची मागणी

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. यावेळी पालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत होते. अशाच गटर, नाले आदी सफाईचे काम करणाऱ्या दोन सफाई कामगारांचा गोरेगाव येथे मृत्यू झाला आहे.

By

Published : Sep 5, 2019, 10:35 AM IST

मृत कर्मचारी

मुंबई- महिनाभर गायब असलेल्या पाऊस गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरू आहे. पावसाने झोडपल्याने मुंबईची तुंबई झाली होती. अशावेळी पालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत होते. अशाच गटर, नाले आदी सफाईचे काम करणाऱ्या दोन सफाई कामगारांचा गोरेगाव येथे मृत्यू झाला आहे.या दोघांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

मुसळधार पावसात पालिकेच्या दोन कामगारांचा मृत्यू, चौकशीची मागणी


विजयेंद्र सरदार बगडी (वय ३६ वर्षे) आणि जगदीश बद्धा परमार्थ (वय ५४ वर्षे), असे मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्याची व मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना योग्य अशी आर्थिक मदत करण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे.

मुंबईत सोमवारपासून पाऊस पडत आहेत. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. बुधवारी दुपारपर्यंत पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. यामुळे मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले होते. मुंबईत पाणी साचल्यावर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या आणि घन कचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना विशेष मेहनत घ्यावी लागते.

काल रात्रीपासून पाऊस जोरात पडत असल्याने गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालयाजवळ पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात जगदीश बद्धा परमार्थ व विजयेंद्र सरदार बगडी हे सफाईचे काम करत होते. सिद्धार्थ हॉस्पिटलजवळ जगदीश बद्धा परमार्थ यांचा कर्तव्य बजाविताना दुपारी १२.३० च्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तर विजयेंद्र सरदार बगडी हे पाण्यात वाहून जाताना लोकांनी त्यांना बाहेर काढून विजयेंद्र सरदार बगडी (वय ३६ वर्षे) यांना पाण्यातून बाहेर काढून जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले, तर जगदीश बद्धा परमार्थ (वय ५४ वर्षे) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना जवळच्या कपाडिया रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाकडून या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे दोघेही गोरेगाव येथील पी साऊथ या वॉर्डमधील सफाई कामगार होते.

चौकशीची मागणी
विजयेंद्र बगडी व जगदीश परमार्थ हे दोघेही एकाच विभागात काम करत होते. भर पावसात एकाचा हृदयविकाराने तर दुसऱ्याचा पाण्यात वाहून जाताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष सुखदेव काशीद यांनी पालिकेच्या सामान्य प्रशासनचे सहआयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्याची व मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना योग्य आर्थिक मदत करण्याची मागणी केली असल्याची माहिती युनियनचे चिटणीस प्रवीण मांजलकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details