महाराष्ट्र

maharashtra

Top 10 @ 1 PM : दुपारी 1 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

By

Published : Jan 26, 2021, 9:29 AM IST

Updated : Jan 26, 2021, 1:11 PM IST

Top 10 @ 1 PM : दुपारी 1 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

सकाळी नऊवाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या
सकाळी नऊवाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

  • नवी दिल्ली - गतवर्षी जून महिन्यात चिनी सैन्याचा पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सामना करताना भारत मातेचे सुपुत्र कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवानांना वीरमरण आले होते. धारातीर्थी पडण्याआधी चिनी घुसखोरीचा प्रयत्न भातीय जवानांनी हाणून पाडला होता. भारत भूमीच्या रक्षणासाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाचा प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला आहे. कर्नल संतोष बाबू यांनी महावीर चक्र तर इतर पाच जवानांना वीरता चक्र जाहीर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा -गलवान खोऱ्यातील हुतात्मा कॅप्टन संतोश बाबू यांना महावीर चक्र

  • मुंबई -शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्र सोडण्यात आले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने एक पाऊल मागे घेतले असते तर 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढण्याची वेळ आलीच नसती असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. हे खरेच प्रजासत्ताक आहे का असा सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा -हे खरेच प्रजासत्ताक आहे का? सामनामधून केंद्रावर टीकास्त्र

  • यवतमाळ - राजधानी दिल्लीत येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या पथसंचलनात महाष्ट्रातील संतांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चित्ररथावरील महाराष्ट्रातील संतांची शिल्पे ही यवतमाळच्या मातीत बनली आहेत. ही यवतमाळ जिल्हासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. दारव्हा तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागात नखेगाव येथे राहत असलेल्या प्रवीण पिल्लारे, असे या शिल्पकाराचे आहे.

सविस्तर वाचा -यवतमाळच्या मातीत बनले महाराष्ट्राच्या चित्ररथावरील शिल्प

  • नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांसह सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यासह १० जणांना पद्मभूषण तर, १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -पद्म पुरस्कार : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह सिंधुताई सपकाळांचाही सन्मान

  • पुणे - महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात पिंपरी-चिंचवडचे गिरीश प्रभुणे यांचा देखील सहभाग आहे. भटक्या- विमुक्त जाती-जमातींच्या विशेष करून पारधी समाजातील मुलांसाठी केलेले त्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच पुनरुत्थान समरसता गुरुकुलमध्ये आनंदाचे वातावरण होते. पुरस्कार मिळणार असून याबरोबरच जबाबदारी वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या पारधी समाजातील मुलांना त्यांना व्यवसाय सुरू करून द्यायचा आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा -पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद; आता आणखी जबाबदारी वाढली- गिरीश प्रभुणे

  • मुंबई : भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी काल (सोमवार) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाली. यावर्षी एकूण 119 जणांना पद्म पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात 29 महिलांचा समावेश आहे. याशिवाय 10 परदेशी नागरिक, 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार आणि एका तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे.

सविस्तर वाचा -Padma Awards २०२१ : महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान

  • नागपूर -गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यात यंदाच्या राष्ट्रपतीपदाच्या यादीत नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन आणि आपात्कालीन विभागाचे सहाय्यक स्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. हा पुरस्कार त्यांना सेवानिवृत्ती नंतर जाहीर झाला. 30 नोव्हेंबर 2020 रोजी ते सेवेतून निवृत्त झाले.

सविस्तर वाचा -अग्निशमन दलातील बहादुर जवान धर्मराज नाकोडे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

  • पंढरपूर (सोलापूर) - देशभरात आज 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, अखंड वारकरी संप्रदायाचे दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती, स्प्रिंगर, कार्नेशियन अशा विविध फुलांचा यात वापर करण्यात आला. या सजावटीत 146 किलो फुलांचा वापर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.

सविस्तर वाचा -प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या मंदिरात 'तिरंगी' सजावट

  • सोलापूर- भारताला 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राजेशाही असलेली भारतातील 500 संस्थाने भारत देशात विलीनीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी सरकारच्या या आदेशाला जुनागढ, काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांनी विरोध केला. पण, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही संस्थाने खालसा करून भारतात विलीन करून घेतले.

सविस्तर वाचा -अक्कलकोट संस्थानने विलीनीकरणावेळी पाच लाख 'सोन्याचे होन' देऊन लोकशाहीला दिले बळ

  • सातारा - जिल्ह्यातील लोणंद येथील एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवनच्या दांडी बीचच्या समुद्रात, सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तीन बोटींच्या मदतीने अंदाजे 400 फुट लांब खाद्यरंग व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली.

सविस्तर वाचा -मालवणच्या समुद्रात साकारला तिरंगा, लोणंदच्या युवकाचा आगळावेगळा प्रयोग

Last Updated : Jan 26, 2021, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details