महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायनमधील तीन शिक्षकांना कोरोनाची लागण; शाळांत शिक्षक हजर राहण्याचा वाद पेटणार? - teacher present in schools

शाळांमध्ये शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले असले तरी तो आदेश अद्यापही शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. मात्र, त्यापूर्वीच मुंबईतील एका शाळेत तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यावर सोमवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत होणाऱ्या शिक्षक आमदारांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

mantralaya
मंत्रालय

By

Published : Nov 2, 2020, 3:51 AM IST

मुंबई - शिक्षकांना शाळांमध्ये हजर राहण्याचे शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशावर राज्यभरातील शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यातच मुंबईतील सायन येथील माध्यमिक शाळेतील तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्याने शाळांमध्ये शिक्षकांना हजर राहण्याचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शाळांमध्ये शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले असले तरी तो आदेश अद्यापही शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. मात्र, त्यापूर्वीच मुंबईतील एका शाळेत तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यावर सोमवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत होणाऱ्या शिक्षक आमदारांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून सायन येथील महापालिकेची माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांना विविध कामानिमित्त बोलावले जात होते. यातील एका शिक्षकाला ऑगस्टमध्ये करोनाची लागण झाली. तरीही शिक्षकांना बोलावणे कायम ठेवल्याने सप्टेंबर महिन्यात आणखी एका शिक्षकाला करोनाची लागण झाली. यानंतर पुन्हा 22 ऑक्टोबरला सर्व शिक्षकांना शाळेत बोलावले. यामुळे 24 ऑक्टोबरला पुन्हा एका शिक्षकाला करोनाची लागणी झाल्याचे समोर आले आहे. यातील एका शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू ओहत.

शिक्षण विभागाकडून बेदखल -

मुंबईत कारोनाची स्थिती अद्यापही तितकी सुधारलेली नाही. यामुळे शिक्षकांना शाळांमध्ये बोलावले जाऊ नये. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसोबतच शिक्षक भारती, शिक्षक परिषदेकडून वेळोवेळी शालेय शिक्षण विभागाकडे विनंती करण्यात आली. मात्र, त्याकडे शिक्षक निरीक्षक कार्यालयाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.

वेतन कपातीचे मेसेज -

शिक्षकांना शाळांमध्ये हजर राहिले नाही तर त्यांच्या वेतनात कपात केली जाईल, असे मेसेज शिक्षण विभागाकडून पाठवले जात आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय अनेकदा गरज नसतानाही शाळांमध्ये शिक्षकांना बोलावले जात असल्याचा आरोपही शिक्षक संघटनाकडून केला जात आहे.

शाळांचे निर्जुंतुकीकरण केले जावे -

मुंबईसह राज्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळेचे निर्जुंतुकीकरण केल्याशिवाय विभाग निरिक्षकांना परस्पर आदेश देऊ नयेच असे पालिकेने सांगावे, अशी मागणी केली जात आहे. त्याशिवाय शाळांमध्ये शिक्षकांना बोलावण्यात येऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी निघाले होते आदेश -

शालेय शिक्षण विभागाने 29 ऑक्टोबरला एक आदेश काढून शाळेतील शिक्षकांना तत्काळ शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने या उपस्थितीसाठी काही नियमावली दिली होती. यात शाळांचे निर्जुतुंकीकरण करण्याची सुचना करण्यात आली आहे.

दिवाळीनंतरच शाळांमध्ये बोलवा -

दिवाळीचा सण हा केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन पुढील आठवड्यात सर्व शाळांची स्वच्छता आणि निर्जुंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीनंतर शिक्षकांना शाळेत बोलवावे. तसेच आता नियमानुसार दिवाळीची सुटी घोषित करावी अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details