मुंबई- कुलाबा गेट वे ऑफ इंडियाजवळ असलेल्या पंच तारांकित ताज हॉटेलने गेली १० वर्षे महापालिकेच्या रस्त्याचा कब्जा केला आहे. याप्रकरणी पालिकेने ताज हॉटेलला ९ कोटी रुपये भरण्यास सांगितले होते. मात्र, हॉटेल व्यवस्थापन आणि पालिका अधिकाऱ्यांनी ही रक्कम ६२ लाखांवर आणली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच ताज हॉटेलकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
ताज पंचतारांकित हॉटेलकडून महापालिकेच्या रस्त्यावर कब्जा; पालिकेचे ९ कोटी रुपये बुडवले - पंच तारांकित ताज हॉटेल
मुंबईत २६/११ ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या घटनेपासून सुरक्षिततेच्या कारणाखाली ताज हॉटेल व्यवस्थपनाने ताज समोरील रस्ता ताब्यात घेतला. त्या ठिकाणी बाहेरील वाहनांना पार्किंगला मनाई केली. मात्र, ताजकडूनच मनमानी करून पार्किंगसाठी रस्त्याचा वापर केला जातो.
![ताज पंचतारांकित हॉटेलकडून महापालिकेच्या रस्त्यावर कब्जा; पालिकेचे ९ कोटी रुपये बुडवले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3936894-thumbnail-3x2-taj.jpg)
मुंबईत २६/११ ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या घटनेपासून सुरक्षिततेच्या कारणाखाली ताज हॉटेल व्यवस्थपनाने ताज समोरील रस्ता ताब्यात घेतला. त्या ठिकाणी बाहेरील वाहनांना पार्किंगला मनाई केली. मात्र, ताजकडूनच मनमानी करून पार्किंगसाठी रस्त्याचा वापर केला जातो. पालिकेने रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. मागील दहा वर्षात रस्ता वापरल्याप्रकरणी ९.८५ कोटी रुपयांची आकारणी पाठवली. ताजने ही रक्कम भरण्यास नकार दिला.
'मुंबईकरांकडून एक रुपया न सोडणारी मुंबई महापालिका ताजवर मेहरबान का?'
प्रशासनाने यानंतर स्थायी समिती आणि पालिका सभागृहाला विचारात न घेता परस्परपणे ही रक्कम ४ कोटी आणि त्यानंतर ६२ लाखांवर आणली. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच कारभार झाल्याचा आरोप रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत उपस्थित केला. मुंबईकरांकडून एक रुपया न सोडणारी मुंबई महापालिका ताजवर मेहरबान का? असा सवाल केला. प्रशासनाकडून पालिका अधिनियमांचे उल्लंघन आणि स्थायी समितीच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम केले जात असल्याचे ते म्हणाले. स्थायी समिती अध्यक्षांनी या गंभीर प्रकरणाचा यानंतर खुलासा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.