महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य हगणदारी मुक्तीच्या दिशेने; १ कोटी शौचालये बांधल्याचा राज्य शासनाचा दावा - swachh bharat abhiyan maharashtra news

शासनाने कोकणाला दिलेले झुकते माप दिले. आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक जिल्ह्यात बहुतांश गावकरी उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे.

राज्य हागणदारी मुक्तीच्या दिशेने
राज्य हागणदारी मुक्तीच्या दिशेने

By

Published : Feb 17, 2021, 4:17 PM IST

Updated : Feb 17, 2021, 4:39 PM IST

मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत ९ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात १ कोटी ६९ लाख ९२ हजार शौचायले बांधण्यात आली आहेत. मुंबई वगळता ३३ जिल्ह्यात शंभर टक्के शौचालयांचे बांधकामे झाली आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ९९ टक्के घरांमध्ये शौचालये बांधल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. मात्र, जिल्हा हागणदारी मुक्त योजनेत शासनाने कोकणाला झुकते माप दिल्याचे दिसून येते.

पाच वर्षात १ कोटी ६९ लाख शौचालये बांधली

राज्याची नागरी लोकसंख्या ११ कोटी, २३ लाख, ७४ हजार ३३३ एवढी आहे. ग्रामीण भागातील एकूण कुटुंबांची संख्या सहा कोटी, १५ लाख, ५६ हजार ०७४ तर शहरी भागात ५ कोटी ८ लाख १८ हजार २५९ इतकी कुटुंब संख्या आहे. बहुतांश कुटुंबांना शौचालयाची सुविधा नव्हती. शौचालयाअभावी अनेक कुटुंबांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. केंद्र सरकारने ही बाब विचारात घेत, २०१२ पासून हागणदारी मुक्त राज्य करण्याचा निर्णय घेतला. शौचालय बांधणीसाठी प्रतिशौचालयास १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. तर २०१४ मध्ये 'स्वच्छ भारत मिशन उपक्रम' हाती घेण्यात आले. उपक्रमांतर्गत राज्यात ३४ राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी गेल्या पाच वर्षात १ कोटी ६९ लाख ९२ हजार १९५ शौचालय बांधण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने यासंदर्भातील माहिती दिली.

राज्य हागणदारी मुक्तीच्या दिशेने
वर्षभरात बांधलेली शौचालयअहमदनगर - ३३७१५, अकोला - १११२८, अमरावती - ४७६१२, औरंगाबाद - ६९२१७, बीड - ४७६२६, भंडारा - १८३८२, बुलडाणा - ३२५१२, चंद्रपूर ४२४५२, धुळे -१०७७९, गडचिरोली - ३७०५२, गोंदिया - २५७८२, हिंगोळी - २८०५५, जळगाव- ७७९३४, जालना - ४७२४५, कोल्हापूर -२६१३४, लातूर - ३४३६०, नागपूर - १४६९९, नांदेड - ३५७६६, नंदूरबार - ४००१०, नाशिक - ५०९६२, उस्मानाबाद - ४६४९४, पालघर - २४१५८, परभणी - २९६००, पुणे - १८५३८, रायगड - ११८००, रत्नागिरी - १२९६७, सांगली - २८३५६, सातारा - १६३७६, सिंधुदूर्ग - ६४९२, सोलापूर - २६०४५, ठाणे - १००५८, वर्धा - १९१६४, वाशिम - २०१४१ आणि यवतमाळ जिल्ह्यात ४७६९३ असे गेल्या वर्षभरात म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण १० लाख ४९ हजार ३०४ शौचालय बांधली, असा राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचा दावा आहे. सर्वाधिक शौचालय या जिल्ह्यातजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक शौचालय बांधण्यात आली. त्याखालोखाल औरंगाबाद, बीड, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, जालना, उस्मानाबाद, नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश आहे.कोकणाला झुकते मापमहाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण हा एक आहे. या विभागात मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे येतात. मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता चार जिल्ह्यात सुमारे २ ते ३ कोटींची लोकसंख्या आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाने कोकणाला दिलेले झुकते माप दिले. आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे आजही जिल्ह्यातील बहुतांश गावकरी उघड्यावर शौचालयाला जात असल्याचे चित्र आहे.
Last Updated : Feb 17, 2021, 4:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details