मुंबईSushma Andhare On Devendra Fadnavis : हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यावर आक्रमक होत विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. तर पहिल्याच दिवशी सत्ताधा-यांनी विरोधकांना बॅकफूटवर ढकलल्याचं चित्र पाहायला मिळालं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाने दिलेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत असताना, दुसरीकडे सभागृहात नवाब मलिक यांच्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
दानवे-फडणवीस यांच्यात खडाजंगी : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात देखील विरोधक आक्रमक होत, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला आणि ज्यांना तुरुंगात पाठवले. तेच आज नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तुमच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मग मविआ सरकारच्या काळामध्ये ते मंत्री असताना त्यांचा राजीनामा तुम्ही का घेतला नाही? असा पलटवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. यामुळं सभागृहात गदारोळ झाला. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्रभाऊ, पूजा चव्हाण या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप संजय राठोंडवर तुम्हीच केला होता. त्यानंतर तुमच्याच पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता नवाब मलिक यांच्या बाबतीतही तेच करत आहात. देवेंद्रभाऊ, सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील. एवढे आपण रंग आणि भूमिका बदलत आहात - सुषमा अंधारे, ठाकरे गटाच्या उपनेत्या