मुंबई -कोरोनामुळे यावर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
काम पुर्ण करण्यासाच्या सूचना -
पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियाद्वारा मुंबईतील शिरीष कार्गो सर्विस प्रा. लिमिटेड कंपनीला वाहतूकदार म्हणून नियुक्त केले आहे. बालभारती भांडार ते शाळेपर्यंत पुस्तके वितरण करून ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी व कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाऊस, वारा अथवा नैसर्गिक आपत्ती यामुळे पुस्तके खराब होणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.