मुंबई : राज्याच्या दुर्गम भागात म्हणजेच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर या ठिकाणी येत्या जून महिन्यापासून श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे केंद्र ( SNDT Womens University Center ) सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Higher Education Minister Chandrakant Patil ) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना फायदा - राज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर तसेच औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये विद्यापीठे आणि विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे. या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र दुर्गम भागातील तालुक्याच्या ठिकाणी विद्यापीठाचे केंद्र किंवा उपकेंद्र नसल्यामुळे उच्च शिक्षणातील संशोधन आणि शिक्षण यापासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वंचित राहतात त्यावर उपाय म्हणून विदर्भातील बल्लारपूर या ठिकाणी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत ( Higher Education Minister Chandrakant Patil ) पाटील यांनी दिली.