महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेला मिळणार ४ मंत्रीपदे ? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

शिवसेनेकडूनही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून, सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.

By

Published : May 26, 2019, 3:53 PM IST

मंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

मुंबई - एनडीएच्या नेतेपद एकमताने नरेंद्र मोदींची निवड झाली आहे. ३० मे रोजी नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काही मंत्र्याचाही शपथविधी होणार आहे. शिवसेनेकडूनही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून, सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.

मंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्रातून भाजपचे ५ मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेला २ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची आशा आहे. गेल्यावेळी राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार होती. मात्र, येनवेळी त्यांना विमानतळावरून परत येण्याची सूचना करण्यात आली होती. आता मात्र, त्यांना निश्चित मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघात भावना गवळी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. मंत्री मंडळातील शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांना संधी देण्यात येईल अशीही चर्चा आहे. संजय राऊत आणि राहुल शेवाळे यांनाही मंत्रीपद मिळेल अशीही शिवसेनेच्या गोटात जोरदार चर्चा आहे.

भाजपच्या कोट्यातून आरपीआयचे रामदास आठवले यांनी पुन्हा मंत्री मंडळात संधी मिळेल. तर नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचेही मंत्रिमंडळात स्थान पक्के आहे. सुरेश प्रभू यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्री मंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, हंसराज अहिर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मंत्री मंडळात घ्यावे अशी नितीन गडकरी यांनी इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details