महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता शिंदे सेनेची महाराष्ट्रात 'भक्ती शक्ती संवाद यात्रा', समस्त हिंदुत्ववादी होणार सहभागी - भक्ती शक्ती संवाद यात्रा

Bhakti Shakti Samvad Yatra: शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्रात आता भक्ती शक्ती संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. (Shiv Sena Shinde Group) छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा विचार एकत्रितरित्या समाजापर्यंत घेऊन जात महाराष्ट्र हितासाठी काम करणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मा समवेत महापुरुषांच्या विचारांच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा आलेख जनतेपर्यंत पोहोचवणे हा या संवाद यात्रेचा मुख्य हेतू आहे. अध्यात्म सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी ही माहिती दिली.

Bhakti Shakti Samvad Yatra
भक्ती शक्ती संवाद यात्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 9:22 PM IST

भक्ती शक्ती संवाद यात्रेविषयी सांगताना अक्षय महाराज भोसले

मुंबईBhakti Shakti Samvad Yatra:आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आता महाराष्ट्रात भक्ती आणि शक्ती संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Shinde Group Yatra) ही संवाद यात्रा महाराष्ट्रात येत्या 25 डिसेंबर पासून 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या संवाद यात्रेत महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ, तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार तसेच गावोगावी असणारे भजन मंडळ सहभागी होणार आहे. यासोबत शक्तीचा अर्थात हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिवशंभो विचारांना समाजापर्यंत नेणाऱ्या सर्व युवक, गोरक्षक आणि ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने भक्ती शक्ती संवाद यात्रा राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये विभाग वार प्रवास करणार असल्याची माहिती अक्षय महाराज भोसले यांनी दिली. (CM Eknath Shinde)

दररोज कीर्तन, प्रवचन:संवाद यात्रा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण अशा पाच टप्प्यात होणार आहे. या समाजातील शिवसेना पक्षाचे स्थानिक खासदार, आमदार, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांची भेट तसेच संवाद साधला जाणार आहे. यामध्ये विशेष बैठका, गावभेटी आणि सभा यांचे देखील आयोजन असणार आहे. तसेच दररोज दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे. यावेळी यात्रेत विविध पंथांचे प्रचारक आणि संतांचे वंशज देखील सहभागी होणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न:यावेळी बोलताना भोसले महाराज म्हणाले की, संतांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच संतांजवळ गेले पाहिजे, हा संदेश यातून एकनाथ शिंदेंनी समाजाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजसत्ता आणि धर्मसत्ता जेव्हा सोबत प्रवास करते तेव्हा निश्चितच उत्तम घडते. म्हणूनच ही संवाद यात्रा राज्यभरात काढली जाणार आहे. 25 डिसेंबरला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातून ही यात्रा सुरू करण्यात येणार असून ही यात्रा पहिल्या टप्प्यात 25 डिसेंबर ते पाच जानेवारी पश्चिम महाराष्ट्र, 7 जानेवारी ते 14 जानेवारी उत्तर महाराष्ट्र या भागात फिरणार असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

  1. संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; आता 'यांच्याकडे' संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी
  2. मुंबईच्या वेशीवर JN1, कशी घ्याल काळजी? काय आहे पालिकेची तयारी, घ्या जाणून
  3. पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतरही तमन्ना भाटिया आहे साऊथ आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

ABOUT THE AUTHOR

...view details