महाराष्ट्र

maharashtra

राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून होणार सुरू

By

Published : Jan 27, 2021, 3:56 AM IST

राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून(27 जानेवारी) सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या.

schools
शाळा

मुंबई -राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून(27 जानेवारी) सुरू होणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या.

हेही वाचा -शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे दहशतवादी - कंगना

दरम्यान, २३ नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तर, आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. कोरोनासंबंधित सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन या शाळा आणि त्यातील वर्ग उघडले जाणार आहेत.

२३ नोव्हेंबर 2020 पासून ९ ते १२ पर्यंतच्या शाळा झाल्या सुरू

कोरोनामुळे मागील जवळपास 10 महिने बंद असलेल्या शाळा आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू होत आहेत. २३ नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यावेळी पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे, शाळाचे निर्जतूकीकरण करणे आदी उपयायोजना करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा -शेतकरी आंदोलनात जे झाले ती राष्ट्रीय लाजिरवाणी बाब - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details