मुंबई- कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचा हा सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेतला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेत काँग्रेस नेते, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याशी चर्चा केली आहे. या वृत्ताला स्वतः संजय राऊत यांनीच दुजोरा दिला आहे. धुळे जिल्हा वगळता सहापैकी एकाही जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश आले नाही. अशा परिस्थितीत नंदुरबारमध्ये त्रिशंकू परिस्थिती असल्याने भाजप झेंडा फडकवण्याचा प्रयत्न बाजूकडून होत आहे.