महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २ हजार १६० कोटी मंजूर

आतापर्यंत ४ हजार २४८.५९ कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे.

By

Published : May 7, 2019, 10:37 PM IST

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २ हजार १६० कोटी मंजूर

मुंबई -राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी २ हजार १६० कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे या मदतीने दुष्काळी भागाला थोडाफार दिलासा मिळणार आहे.

आतापर्यंत ४ हजार २४८.५९ कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details