महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईशान्य मुंबईत रामदास आठवलेंना उमेदवारी द्यावी, रिपाइं काढणार इशारा रॅली

रामदास आठवलेंना उमेदवारी द्यावी, यासाठी गोवंडी ते मुलुंड इशारा रॅली काढण्यात येणार असल्याचे आरपीआय ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

By

Published : Mar 31, 2019, 11:40 PM IST

ईशान्य मुंबईत रामदास आठवलेंना उमेदवारी द्यावी, रिपाई काढणार इशारा रॅली

मुंबई - ईशान्य मुंबई मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून सेना-भाजपमध्ये वाद विकोपाला गेला आहे. तर इतर उमेदवार प्रचार कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. किरीट सोमय्या यांना भाजपची लोकसभा उमेदवारी मिळते का? हा पेच निर्माण झाला असताना युतीतील मित्रपक्ष रिपाइं आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत आहेत. रामदास आठवलेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी गोवंडी ते मुलुंड इशारा रॅली काढण्यात येणार असल्याचे आरपीआय ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

ईशान्य मुंबईत रामदास आठवलेंना उमेदवारी द्यावी, रिपाई काढणार इशारा रॅली

यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय नेते अविनाश महातेकर म्हणाले, राज्यातील २ जागेचा तिढा होता. त्यातील सांगलीच्या जागेचा तिढा सुटला. मात्र, ईशान्य मुंबईचा सुटला नाही. त्यामुळे शिवसेना आमदार सुनील राऊत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असे २ दिवसांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा चालू राहिला तर नुकसान सर्वांचेच होणार आहे. त्यामुळे ही जागा रामदास आठवले यांना सोडावी कारण हा भाग रिपाइंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ४ एप्रिल रोजी रिपाईची राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 6 तारखेच्या रॅली संदर्भात चर्चा व पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

  • घाटकोपरमध्ये पार पडली बैठक

या बैठकीस आरपीआयचे राष्ट्रीय नेते अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्षा आशाताई लांडगे, मुंबई अध्यक्षा अभयाताई सोनवणे आदि उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details