महाराष्ट्र

maharashtra

Rakhi Sawant Marriage Not Fake : राखीचे आदिल दुर्रानीसोबतचे लग्न खोटे नाही, वकिलांनी दिली प्रतिक्रिया

By

Published : Jan 13, 2023, 6:31 PM IST

राखी सावंतचे आदिल दुर्राणीसोबतचे लग्न खोटे नव्हते, असा खुलासा राखी सावंतच्या वकिलाने केला आहे. आदिलने लग्न गुप्त ठेवण्यास सांगितले होते, असा खुलासाही तिने केला. दरम्यान, राखीची वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांनी राखी, आदिलचे लग्न कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.

Rakhi Sawant Marriage
राखीचे आदिलच दुर्रानीसोबतचे लग्न

मुंबई -ड्रामा क्वीन राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं आहे. इस्लामनुसार लग्न केल्यानंतर राखी सावंतने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं होतं. तसेच आदिलनेच आपल्याला लग्न लपवून ठेवण्यास सांगितलं होतं, असा खुलासाही तिने केला होता. दरम्यान, राखीच्या वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी स्पष्ट केले की, राखी, आदिल यांचे लग्न कायदेशीर आहे.

राखीने केला निकाह -राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीशीसोबत काळापासून डेटिंग करत होता. 29 मे 2022 रोजी त्यांचा निकाह झाला. राखीने तिच्या लग्नाबद्दल जाहीरपणे सांगितले असले तरी, आदिल खान अजूनही त्याबद्दल काहीही बोलला नाही आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्या इंटिमेट वेडिंग अफेअरची छायाचित्रे इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. या दोघांनी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली, पण राखीने नुकतीच एका पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना ही बातमी जाहीर केली.

राखीने केली लग्नाची घोषणा - राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी यांचे फोटोंनी इंस्टाग्रामवर तुफान धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीने खुलासा केला की, आदिलला त्यांचे नाते गुप्त ठेवायचे सांगितले होते. पण सात महिने थांबल्यानंतर अखेर राखीने तिच्या लग्नाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या दरम्यान आदिलने हे लग्न खोटे असल्याचा दावा केला आहे. तेव्हा राखीच्या वकिल फाल्गुनी ब्रम्हभट्ट सत्य उघड करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

राखीचे लग्न कायदेशीर - राखीने त्यांच्या निकाहाची छायाचित्रे, व्हिडिओ पोस्ट करून म्हैसूरस्थित व्यावसायिकासोबतच्या लग्नाची पुष्टी केली आहे. तिचे वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी पुढे दावा केला की, त्यांचे लग्न कायदेशीर आहे. हे जोडपे बऱ्याच दिवसापासून डेटिंग करत होते. 29 मे 2022 रोजी त्यांचे लग्न झाले. फाल्गुनी यांनी सांगितले की, हे लग्न अजिबात खोटे नाही. सर्वप्रथम निकाह पार पडला. त्यांची नोंद देखील करण्यात आली आहे.

राखीचा निकाहनामा -योग्य निकाहनामा आहे. निकाह केल्यानंतर, तुम्हाला तुमचा विवाह महानगरपालिकेकडे नोंदवावा लागतो, अशी मुंबईत पद्धत आहे. म्हणून, राखी, आदिलने महापालिकेत फॉर्म भरला होता. कार्यालयात जाऊन त्यांनी लग्नाची नोंदणी केली होती.त्यांनी लग्नाचे प्रमापत्र घेतले आहे कींवा नाही याबाबत सांगता येणार नाही. मात्र, त्यांच्या वैयक्तीक कारणामुळे ते त्यांचा विवाह लपवत असण्याची शक्याता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया राखी सावंताच्या वकिलाने दिली आहे.

हेही वाचा -Rakhi Sawant Accepts Islam: 'आता परिणाम भोगायला तयार राहा'.. राखी सावंतला हरिद्वारच्या परशुराम आखाड्याकडून धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details