महाराष्ट्र

maharashtra

प्रश्नांची उत्तरे द्या; अन्यथा जनआक्रोश, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By

Published : Aug 4, 2019, 7:17 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले.

राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. मी विचारलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली नाहीत तर, जनआक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला.


काय आहेत राजू शेट्टींचे प्रश्न
1) कामगार कल्याण मंडळातून किती लाभार्थ्यांना डिबीटीद्वारे पैसे दिले?
२) पीकविम्यात झालेल्या भ्रष्टाचाराची सरकार माहिती देणार का?
3) पाशा पटेल यांनी कृषीमूल्य आयोगाला केलेल्या शिफारसी योग्य आहेत का?
4) 'कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एसटीबीटी बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करु' याचे उत्तर देणार का?
5) एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर काय कारवाई करणार?
6) भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात घेतल्याबद्दल बोलणार का?
7) धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिले का?
8) लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण, स्वतंत्र धर्माचा दर्जा कधी देणार?
9) मेगा नोकरभरतीचे काय झाले?
10) कंत्राटी कामगारांबाबत धोरण काय?
11) कृषी वीज जोडणीत शेतकऱ्यांना लावलेला वीज दर योग्य आहेत का?

या सर्व प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यावीत. अन्यथा 'जनआक्रोश आंदोलन' करणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.


ईव्हीएम -व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा !
ईव्हीएम -व्हीव्हीपॅटच्या विरोधात राज्यातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. येत्या 21 ऑगस्टला याविरोधात मुंबईत मोर्चा निघणार आहे. राजू शेट्टींनीही ईव्हीएम -व्हीव्हीपॅट हटवण्याची मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details