महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 3, 2021, 1:42 PM IST

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: कृषी कायद्याविरोधात पंधरा हजार किलोमीटर अंतर कापत 'त्याने' गाठली मुंबई

केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ऐतिहासिक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशातील प्रत्येक राज्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा आणि कृषी कायद्यांना विरोध व्हावा म्हणून "किसान काफीला" ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला प्रत्येक राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंजाब पटियालामधून एका चार चाकीतून सुरू झालेली ही मोहीम आता उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमधून 15 हजार किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत पोहोचली आहे.

farm laws,   punjabi boy manjindar singh ,  farmer protest mumbai ,  delhi farmers protest ,  शेतकरी आंदोलन दिल्ली ,  मंजिंदर सिंग ,  मुंबई लेटेस्ट न्यूज
ईटीव्ही भारत विशेष

मुंबई -कृषी कायद्याविरोधात संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी पंजाबच्या पटियालामधून तरुण शेतकरी मजिंदर सिंग या तरुणाने आपल्या चार चाकी गाडीने "किसान काफीला" काढला आहे. तब्बल शंभर दिवसात विविध राज्यातून आपल्या चारचाकी गाडीने 15 हजार किलोमीटर अंतर कापत त्या तरुणाने आज मुंबई गाठली आहे. त्यांच्याशी ईटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे.

15 हजार किलोमीटर प्रवास-

तरुण शेतकरी मजिंदर सिंग यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ऐतिहासिक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशातील प्रत्येक राज्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा आणि कृषी कायद्यांना विरोध व्हावा म्हणून "किसान काफीला" ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला प्रत्येक राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंजाब पटियालामधून एका चार चाकीतून सुरू झालेली ही मोहीम आता उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमधून 15 हजार किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाषेची अडचण येऊ नयेत, म्हणून पश्चिम बंगाल नागालँड अशा विविध राज्यांमधील विद्यापीठातील विद्यार्थी व कार्यकर्त्यांकडून मदत केली जात आहे.

कृषी कायद्याविरोधात पंधरा हजार किलोमीटर अंतर कापत 'त्याने' गाठली मुंबई..

स्थानिक भाषेतील पत्रकांचा आधार-

मजिंदर सिंग यांनी सांगितले की, प्रवासात मिळेल त्या शेतकऱ्यांमध्ये नवे कृषी कायदे त्याचे दुष्परिणाम किमान आधारभूत किमतीचे महत्व अशा सर्व मुद्द्यावर जनजागृती करत आहोत. त्यामुळे दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनास विविध राज्यातील शेतकऱ्यांकडून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वास आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी स्थानिक भाषेतील पत्रकांचा आधार घेत आहेत. त्यासाठी त्या-त्या राज्यातील विद्यार्थी, कार्यकर्ते, शेतकरी मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण शंभर दिवस गाडीतच-

ही मोहीम सुरू करताना कमीत कमी खर्चात मोहीम यशस्वी व्हावी, म्हणून गाडीत झोपतो. जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून त्याने गाडीतील मागील सीट खाली एक गॅस शेगडी ठेवली आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना असल्यामुळे सर्व नियमांचे पालन मंजिंदर करतो आहे. त्याने आपल्या गाडीवर शेतकऱ्यांच्या समस्यांचे स्लोगन लिहिलेले आहे. तसेच "गाडीवर जय जवान, जय किसान'चे पोस्टर लावले आहे. त्यामुळे रत्यावरुन गाडी जात असताना बरेच शेतकरी त्यांना विचारत आहे. याचा फायदा त्यांना जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. आता मुंबईनंतर पुढे मध्य प्रदेश मार्ग ही मोहीम सुरू राहील, असेही मजिंदर सिंग यांनी सांगितले.

देशभरातील शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे -

विविध राज्यांमध्ये किमान आधारभूत किंमत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांना एमएसपीअंतर्गत गहू आणि तांदळाचे साठी चांगला दर मिळत आहे. मात्र, इतर राज्यात खरेदीदारांकडून शेतकऱ्यांना निम्मा भाव दिला जात आहे. नव्या कृषी कायद्याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना माहीत नसल्याने अद्याप त्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात नाही. पिकांना चांगला दर मिळत नसल्याने 70 टक्‍यांहून अधिक शेतकर्‍यांच्या अंगावर लाखांच्या घरात कर्जाचे ओझे झाले आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असेही मजिंदर सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा-मेळघाटात आढळणाऱ्या गोलाकार दगडांचे गूढ; स्थानिकांकडून केली जाते गोल्यादेवाची पूजा

ABOUT THE AUTHOR

...view details