मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन मुंबई पोलिसांना आला होता. हा फोन दुपारी 12.45 च्या सुमारास आला. धमकीचा फोन आल्याने सुरक्षा व्यवस्था चोख तैनात करण्यात आली. मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये हा फोन आला. यानंतर मंत्रालयाच्या बाहेरील सगळ्या गेटवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, अडीच तासाच्या तपाणीनंतर मंत्रालय परिसरात कोणातीही आक्षेपार्य वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, हा धमकीचा फोन नागपूरमधील एका व्यक्तीने केला असल्याची माहिती पुढे आली आहे. सागर काशिनाथ मांढरे असे या व्यक्तीचे नाव आहे.
'मंत्रालय' ही संवेदनशील इमारत -
राज्याचा गाड्या ज्या इमारतीमधून हाकला जातो. ती इमारत म्हणजे मंत्रालय. अनेक शासकीय कार्यालये येथेच आहेत. तसेच प्रत्येक महत्त्वाच्या विभागाचे सचिव या मंत्रालयात कार्यरत आहेत. याच मंत्रालयात मंत्र्यांची दालने देखील आहेत. तसेच मुख्य सचिवांची दालनेदेखील येथेच आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या मंत्रालयात अनेक जण आपली गाऱ्हाणे घेऊन येतात. त्यांच्या तक्रारीचे निवारण याच मंत्रालयातून होत असते. अनेकदा कॅबिनेटची बैठक मंत्रालयातच होत असते. तसेच मंत्रालयाला लागूनच हाकेच्या अंतरावर मंत्र्यांचे शासकीय बंगलेदेखील आहेत.
मंत्रालयाची इमारत कधी-कधी चर्चेत आली?