त्यांच्या 'काश्मीर मुक्ती'च्या घोषणा कशासाठी? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल - Anti India campaign
फडणवीस यांनी फ्री काश्मीर या आशयाच्या फलकासंदर्भातील एएनआयच्या ट्विटचा आधार घेतल हे आंदोलन कशाचे आहे आणि काश्मीर मुक्तीच्या घोषणा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या फुटरीता वाद्यांना आपण का सहन करायचे, असाही सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
![त्यांच्या 'काश्मीर मुक्ती'च्या घोषणा कशासाठी? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल त्यांच्या 'काश्मीर मुक्ती'च्या घोषणा कशासाठी? फडणविसांचा ठाकरेंना सवाल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5619728-989-5619728-1578333999457.jpg)
मुंबई - गेट वे इंडियावर दिल्लीतील जेएनयू मारहाण प्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनवेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांनी काश्मीर मुक्त करण्याचे फलक झळकवले आहेत. यावरून आता माजी मुख्यमंत्री सध्याचे विधासभा विरोधी पक्ष नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.
फडणवीस यांनी फ्री काश्मीर या आशयाच्या फलकासंदर्भातील एएनआयच्या ट्विटचा आधार घेतल हे आंदोलन कशाचे आहे आणि काश्मीर मुक्तीच्या घोषणा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या फुटरीता वाद्यांना आपण का सहन करायचे, असाही सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
उद्धवजी तुमच्या समोर अशा प्रकारच्या भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत, आणि तुम्ही ते सहन करता का? असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना केला.