महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक संपली; कट्टर विरोधक बसले शेजारी, खातेवाटपाबाबत चर्चा - maharashtra political crisis

अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर आज पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी केलेले 9 आमदारही सहभागी झाले होते. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 4, 2023, 1:38 PM IST

Updated : Jul 4, 2023, 2:30 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अजित पवार आपल्या साथीदारांसोबत मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पर पडली आहे.

खातेवाटपावर चर्चा - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजून खातेवाटप झाले नाही. त्याबाबतच चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार सहभागी -राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाची बैठकीला उपस्थिती लावली आहे. पहिल्याच बैठकीत दोन उपमु्ख्यमंत्री शेजारी शेजारी बसल्याचे दिसून आले आहे. तसेच राष्ट्रवादीचे अन्य 8 मंत्रीही या बैठकीला हजर होते.

एकमेकांचे कट्टर विरोधक बैठकीत एकत्र - राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी हल्लाबोल केला होता. मात्र, आज पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नेत्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ या मंत्र्यांवर आली आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्र्यांवर विविध आरोप केले होते. मात्र आज त्यांच्यासोबत बैठकीला हे नेते एकत्र बसले आहेत.

शरद पवारांची बंडखोरांवर कारवाई - अजित पवार यांनी बंडखोरी करुन सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पत्र लिहिल्यानंतर शरद पवार चांगलेच आक्रमक झाले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे पवारांची साथ देणार का?
  2. Maharashtra Political Crisis: भाजप म्हणजे राजकारणातील 'सिरीयल किलर आणि बलात्कारी'- संजय राऊत यांची गंभीर टीका
  3. NCP Political Crisis : ...त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
Last Updated : Jul 4, 2023, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details