महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत अलर्ट, गरज पडल्यास नौदलही दाखल होण्याची शक्यता - निसर्ग चक्रीवादळ लेटेस्ट अपडेट

निसर्ग चक्रीवादळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत येईल अशी शक्यता होती. मात्र, या वादळाची गती कमी झाल्याने हे वादळ आता दुपारी 2 ते 3 वाजण्याच्यादरम्यान मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी गरज पडल्यास नौदलाला देखील पाचारण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. याबाबत वरळी-वांद्रे समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी...

nisarg cyclone latest update  nisarg cyclone news  nisarg cyclone mumbai  nisarg cyclone effect  निसर्ग चक्रीवादळ मुंबई  निसर्ग चक्रीवादळ लाईव्ह अपडेट  निसर्ग चक्रीवादळ लेटेस्ट अपडेट  निसर्ग चक्रीवादळ मुंबई
निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत अलर्ट, गरज पडल्यास नौदलही दाखल होण्याची शक्यता

By

Published : Jun 3, 2020, 12:06 PM IST

Updated : Jun 3, 2020, 3:00 PM IST

मुंबई - येत्या काही तासांत निसर्ग चक्रीवादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. या वादळामुळे मुंबईत पालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, नेव्ही आदी विभाग समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत समुद्रकिनारी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत येईल अशी शक्यता होती. मात्र, या वादळाची गती कमी झाल्याने हे वादळ आता दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी गरज पडल्यास नौदलाला देखील पाचारण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. याबाबत वरळी-वांद्रे समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी...

निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत अलर्ट, गरज पडल्यास नौदलही दाखल होण्याची शक्यता

निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...

1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.

2) 3 जून रोजी कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.

3) आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.

4) घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.

5) आपले पशूधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.

6) आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.

7) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.

8) सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

9) आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.

10) पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडिक्लोर मिसळावे.

11) मच्छीमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

12) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.

13) ग्रामकृती दलाच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.

14) सद्यस्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाइन असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकापासून सुरक्षित अंतरावर असतील, याची दक्षता घ्यावी.

15) मदत आवश्यक असल्यास आपली ग्रामपंचायत/तहसिलदार कार्यालय/ जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा.

Last Updated : Jun 3, 2020, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details