महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाविद्यालयीन निवडणुका हरलो तर विधानसभेतही पराभव होईल' भितीपोटी निवडणुका लांबवल्या; विद्यार्थी संघटनेचा आरोप

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुका आता ऑगस्ट महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

By

Published : Aug 16, 2019, 12:44 PM IST

मुंबई विद्यापीठ

मुंबई -राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुका आता ऑगस्ट महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पाश्वभूमीवर 'महाविद्यालयीन निवडणुका हरलो तर विधानसभेतही पराभव होईल' या भितीपोटी सरकारने महाविद्यालयीन निवडणुका लांबवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने केला आहे.

'महाविद्यालयीन निवडणुका हरलो तर विधानसभेतही पराभव होईल' भितीपोटी निवडणुका लांबवल्या; विद्यार्थी संघटनेचा आरोप

नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर त्याच वर्षात महाविद्यालयालयीन निवडणुका घेणे आवश्यक होते. पण राज्य सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये घोषणा केली की, २०१९ मध्ये महाविद्यालयीन निवडणुका घेतल्या जातील. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच विद्यापीठातील विद्यार्थीमध्ये निवडणुकांमुळे एक नवचैतन्य निर्माण झाले होते. कारण २५ वर्षानंतर या निवडणुका होणार होत्या.

अचानक महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार होत्या व त्यात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असता, यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम झाला असता. तसेच भाजप व शिवसेना पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले असते. असा टोला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details