मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे. यामुळे सध्या मुंबईत सुरू असलेल्या २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. २१ ऑगस्टपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईकरांना दिलासा... २१ ऑगस्टपासून २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात - mumbai water news
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात पुरेसा जलसाठा नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ५ ऑगस्टपासून पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्त्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली.
![मुंबईकरांना दिलासा... २१ ऑगस्टपासून २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात file pic](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8484446-398-8484446-1597866276684.jpg)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात पुरेसा जलसाठा नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ५ ऑगस्टपासून पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्त्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे १९ ऑगस्ट रोजी ८५ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. याचदिवशी ऑगस्ट २०१८ मध्ये ९१.८३ टक्के तर ऑगस्ट २०१९ मध्ये ९४.२८ टक्के इतका जलसाठा होता.
हेही वाचा -मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण 'ओव्हरफ्लो'; सातपैकी तीन धरणे भरली
मुंबईचा पाणीपुरवठा पुढील वर्षी ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी सध्याची २० टक्के लागू असलेली पाणीकपात २१ ऑगस्टपासून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत आहे. ही पाणी कपात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांनादेखील लागू राहणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा योग्य वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.