महाराष्ट्र

maharashtra

'मुंबईतील निर्जन स्थळे सुरक्षित करणार'

By

Published : Jan 2, 2020, 5:48 AM IST

Updated : Jan 2, 2020, 6:06 AM IST

मुंबईत अनेक निर्जन स्थळे आहेत. त्याठिकाणी महिला आणि नागरिक जाण्यास घाबरतात. महालक्ष्मी येथील शक्तीमिलमध्ये एका युवतीवर बलात्कार झाला होता. त्यामुळे निर्जन स्थळे सुरक्षित करण्याची मागणी गेले अनेक वर्षांपासून केली जात होती. याची दखल महापौरांनी घेतली आहे. येथील निर्जन स्थळाची माहिती मागवण्यात आली आहे.

Kishori Pednekar (Mayor, Mumbai)
किशोरी पेडणेकर (महापौर, मुंबई)

मुंबई - जागतिक दर्जाची मुंबई सुरक्षित नसल्याचा आरोप अनेक वेळा केला जातो. याच शहरात शक्ती मिल सारखे बलात्काराचे प्रकरण घडले आहे. यामुळे महिला आणि नागरिकांमध्ये निर्जनस्थळी जाताना भीतीचे वातावरण असते. ही भीती दूर व्हावी म्हणून येथील निर्जन स्थळे खुली करून त्याठिकाणी लोकांची वर्दळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

किशोरी पेडणेकर (महापौर, मुंबई)

महापौर परिषद सुरु करण्यासाठी सर्व पक्षियांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

हेही वाचा -...त्यामुळे नेते नाराज तर होणारच; छगन भुजबळांनी दिले स्पष्टीकरण

पेडणेकर पुढे म्हणाल्या, मुंबईत अनेक निर्जन स्थळे आहेत. त्याठिकाणी महिला आणि नागरिक जाण्यास घाबरतात. महालक्ष्मी येथील शक्तीमिलमध्ये एका युवतीवर बलात्कार झाला होता. त्यामुळे निर्जन स्थळे सुरक्षित करण्याची मागणी गेले अनेक वर्षांपासून केली जात होती. याची दखल महापौरांनी घेतली आहे. येथील निर्जन स्थळाची माहिती मागवण्यात आली आहे. अशा स्थळांना भेटी देऊन ती खुली करण्यासाठी तसेच अशा ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढवता यावी, म्हणून संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. सुरक्षित मुंबईबरोबरच स्वच्छ मुंबई आणि चांगले रस्ते देण्याचा संकल्पही आपण नवीन वर्षासाठी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -ठाकरे सरकारचे खातेवाटप लवकरच.. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरूच

चर्चा करूनच महापौर परिषदेचा निर्णय -

महापालिकांमध्ये महापौरांना अधिकार नसतात सर्व अधिकार आयुक्तांना असतात. महापौरांना अधिकार मिळावेत, अशी मागणी सर्वच महापालिकेमधील महापौर करत असतात. देशभरातील महापौरांची 'महापौर परिषद' ही संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून महापौर परिषद सुरु करून महापौरांना अधिकार द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना महापौर परिषदचे चांगले आणि वाईट परिणाम आहेत. महापौर परिषद सुरु केल्यावर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा विचार करण्यासाठी सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, सर्व पक्षीय गटनेते यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.

देशभरातील सर्व राज्यात महापौर परिषद आहे. मात्र, महाराष्ट्रात महापौर परिषद नाही. महापौर परिषद लागू करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच मुंबईत पहिली महापौर परिषद लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 2, 2020, 6:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details