मुंबई - राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी साथ दिली तर कोरोनाचा प्रसार पुन्हा रोखता येऊ शकतो, असा आशावाद महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. मॉलमध्ये जाणा-यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. मात्र, अशा टेस्ट किती वेळा करणार याबाबत संभ्रमावस्था आहे. यासाठी धोरण निश्चित करावे लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मॉलमधील चाचण्यांबाबत संभ्रम -
मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी माध्यमांशी चर्चा केली. मास्क ही शिक्षा नाही तर सुरक्षा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मास्क वापरा आणि गर्दी करू नका, असे आवाहन करत, पालिकेकडून घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची महापौरांनी माहिती दिली. लोकांची सुरक्षा ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, लोकांनीही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मॉल, पब, आदी गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे चाचण्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मॉलमध्ये जाणा-यांची चाचणी कितीवेळा करायची तसेच बंधनकारक करायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही पेडणेकर म्हणाल्या.
...तर कोरोनाला थोपवणे शक्य -