महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 12, 2021, 12:51 PM IST

ETV Bharat / state

मुंबईतील प्रत्येक वॉर्डात 2 नोडल अधिकारी; खाजगी हॉटेलमध्ये सुविधा

कोरोना रुग्णांसाठी प्रत्येक वॉर्डात 2 नोडल अधिकारी नेमणार असून, हे अधिकारी रुग्णांना बेडसाठी मदत करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला घरातच राहून सण साजरा करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केले आहे.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

मुंबई - शहरातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कोविड रुग्णांना बेड मिळावा, म्हणून मुंबई महापालिकेतर्फे योग्य पावलेही उचलली जात आहेत. गुढी पाडवा सण घरातच राहून लोकांनी साजरा करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना रुग्णांसाठी प्रत्येक वॉर्डात 2 नोडल अधिकारी नेमणार असून, ते रुग्णांना बेडसाठी मदत करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

प्रत्येक वॉर्डात 2 नोडल अधिकारी
अधिक माहितीसाठी मुंबईकरांनी १९१६ वर फोन करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबईकरांनी वरील क्रमांकावर फोन करावा अथवा तेथील ठिकाणच्या प्रभाग कार्यालयातील वॉर रूममध्ये फोन करावा. त्यामुळे मदत मिळणेही शक्य होईल असेही त्यांनी यावेळेस सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांना २४ तासांच्या आत अहवाल दिल्यास, लवकर उपचार देता येतील. आणि योग्य ठिकाणी वर्गवारी करून त्यांना दाखल करता येईल. खासगी रुग्णालयात लक्षणे नसलेले अनेक रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये त्यांना राहण्यासाठी कोविड सेंटरसारखी व्यवस्था करून देऊ. त्यांनाच पैसे भरावे लागतील. त्यांना हॉटेल निवडण्याची परवानगी असेल. तेथे सगळी रुग्णालयाप्रमाणे व्यवस्था असेल. कारण नसताना रुग्णालयातील बेड अडवू नये, असेही त्यांनी आवाहन केले. पालिकेने ३२५ अतिरिक्त बेड असून, ४६६ तयार बेड आहेत. तसेच येत्या ७ दिवसांत ११०० बेड कोविड सेंटरमध्ये तयार केले जातील.

गुढी पाडवा घरी साजरा करा...

गुढी पाडव्यासोबत आंबेडकर जयंतीही आहे. मुंबईकरांनी घरीच राहून आनंदाने सण साजरा करा. बाबासाहेबांनी केलेली देशसेवा स्मरून आपणही घरी राहून देशसेवा करू, तेच खर अभिवादन ठरेल, असेही महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

अग्निसुरक्षा सप्ताह यंदा होणार नाही...

काल आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही मेडिकल दुकानांनी रुग्णाचे नातेवाईक असूनही औषध दिलं नाही. कोणीही औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. नरेंद्र मोदींचे आभार मानेन. कारण रेमडीसीवरची निर्यात थांबवली. देशात पहिली लस उपलब्ध करून दिली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा -मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचीही होणार बदली

हेही वाचा -कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमधील बेड द्या, पालिका आयुक्तांची विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details