महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री ठाकरे बॅनरबाजीबाबत काँग्रेस नेत्यांवर करावाई करतील का - खासदार कोटक

By

Published : May 20, 2021, 7:39 PM IST

Updated : May 20, 2021, 7:48 PM IST

दिल्लीनंतर आता मुंबईतही 'मोदीजी हमारे बच्चोंकी वैक्सिन विदेश क्यो भेज दिया?', अशी पोस्टरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली होती. बॅनरबाजी करुन राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करतील का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बॅनर
बॅनर

मुंबई -देशभरात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींविरोधात दिल्लीनंतर आता मुंबईतही 'मोदीजी हमारे बच्चोंकी वैक्सिन विदेश क्यो भेज दिया?', अशी पोस्टरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर आता फाडून टाकले आहे. कॉंग्रेसकडून लावलेल्या या बॅनरविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी तक्रार दिली आहे. बॅनरबाजी करुन राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करतील का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बोलताना खासदार कोटक

खासदार मनोज कोटक म्हणाले, काँग्रेस पंतप्रधानांना बदनाम करण्याचे षड;यंत्र कचत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असतात की कोरोनाच्या या वातावरणात राजकारण केले जाऊ नये. मात्र, त्यांच्याच सरकारमधील एक घटक पक्ष असे वागत आहे. बॅनरबाजी करुन राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करतील का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा -मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? दिल्लीपाठोपाठ मुंबईतही काँग्रेसची बॅनरबाजी

Last Updated : May 20, 2021, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details