महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा, आमदार अमिन पटेल यांची मागणी

म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.

By

Published : Jul 17, 2019, 2:14 PM IST

आमदार अमिन पटेल

मुंबई - विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.

धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा - आमदार अमिन पटेल
केशरबाई इमारत दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणखी ५ तास बचावकार्य करेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीवरुन म्हाडा आणि महानगरपालिका वाद करण्याची गरज नाही. सेस भरत असल्याने म्हाडाने जबाबदारी झटकता कामा नये, असेही पटेल यावेळी म्हणाले. पुर्नवसनासाठी बीपीटीची जागा निश्चित करुन अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाययोजना करुन सरकारने धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details