मुंबई - शहरात कोरोनाचे रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातले ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागातून येत आहेत. या भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी तत्वावर ५० अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम तीन आठवडे चालणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
मुंबईत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' राबविणार - mission zero mumbai
मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागात फिरते दवाखाने घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६ दिवसांवर गेला आहे. मात्र, मुंबईतील काही वॉर्डमध्येच रुग्ण वाढत असल्याने खासगी संस्थांच्या माध्यमातून मिशन झिरो राबवण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
![मुंबईत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' राबविणार Mission Zero](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7724727-422-7724727-1592827859634.jpg)
अंधेरी पश्चिम परिसरातील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे भारतीय जैन संघटना, क्रेडाई एमसीएचआय, देश अपनाये यांच्या सहकार्याने रुग्णांचा शोध व उपचार यासाठी ५० फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेनसरी) सुरू करण्यात आले आहेत. मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागात हे फिरते दवाखाने घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६ दिवसांवर गेला आहे. मात्र, मुंबईतील काही वॉर्डमध्येच रुग्ण वाढत असल्याने खासगी संस्थांच्या माध्यमातून मिशन झिरो राबवण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.