महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2020, 5:21 PM IST

ETV Bharat / state

राज्यातील कापूस खरेदी 15 जूनपर्यंत करण्याचे सहकार मंत्र्यांचे आदेश

कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी आणि शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात. कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

balasaheb patil
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई - कोरोनाचे संकट, पावसाचे आगमन आणि शेतकऱ्यांची धांदल हा संभाव्य धोका लक्षात घेऊन कापूस खरेदीतील अडचणी दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही खरेदी 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबतचा जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन संवाद साधला. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी सूचना केल्या.

पाटील म्हणाले, कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी आणि शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात. कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी. सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे. इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआयने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने उपलब्ध करून द्यावेत.

राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी, कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या सकंलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, सीसीआच्या सीएमडी अल्ली राणी, कॉटन फेडरेशनचे चेअरमन राजाभाऊ देशमुख, व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सुनील पवार, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details