महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्या वक्तव्याचा विपर्यास; इंदिरा गांधीची तुलना 'यांच्या'सोबत होऊच शकत नाही - जितेंद्र आव्हाड मुंबई

आज जे देशात होत आहे, एकेकाळी देशात इंदिरा गांधींनी देखील असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता', असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी केले आहे.

minister jitendra Awhad clarification on Beed Statement
जितेद्र आव्हाड

By

Published : Jan 30, 2020, 1:28 PM IST

मुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र, बीडमध्ये केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तसेच इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत कधीच तुलना होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

जितेद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

दरम्यान, आज जे देशात होत आहे, एकेकाळी देशात इंदिरा गांधींनीही असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता', असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी केले आहे. बीड येथील संविधान बचाव महासभेत जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केले होते.

हेही वाचा - 'इंदिरा गांधीनींही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला' मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय क्रांतिकारक होते. मात्र, आणीबाणीबद्दल मतमतांतरे असू शकतात. तसेच एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही. इंदिराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही. ते इंदिराजींच्या जवळपासही पोहचू शकत नाही, असेही ते म्हणाले. इंदिरा गांधीनी पंतप्रधान झाल्यावर बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, 1971 झालेले भारत-पाक युद्ध तसेच पोखरण चाचणी हे अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतले, असेही आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details