महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 21, 2019, 4:28 AM IST

ETV Bharat / state

म्हाडाच्या घरांची लॉटरी डिसेंबरच्या अखेर निघणार, ६ हजारांपेक्षा जास्त घरे उपलब्ध

नवी मुंबईतील घणसोली येथे ४० घरे, वसई येथील वळीव येथे १५ घरे, ठाण्यातील मोगरा पाडा, खोणी, शिरढोण (कल्याण) येथे एकूण ५ हजार घरे म्हाडाला उपलब्ध झाली आहेत. एकूण ६ हजार ५०० घरांच्या लॉटरीची तय्यारी सुरु केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

म्हाडाची इमारत

मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाने सामाजिक गृहनिर्माण घटकांसाठी एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गत १९ ऑगस्ट २०१८ मध्ये ९ हजार १८ घरांच्या लॉटरी काढली होती. या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया अजून सुरु असून काही विजेते त्या घरात राहायला गेले आहेत. मात्र एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गत २० टक्क्यातील ६ हजार ५०० घरे म्हाडाकडे आली असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही लॉटरी काढण्यात येणार अशी माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी दिली.

म्हाडाच्या कोकण मंडळाने कोकणातील विविध तालुक्यात लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिकांना विविध योजनांच्या माध्यामातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. म्हाडाकडे पुन्हा एकदा एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पातील २० टक्के योजनेतील ६ हजार ५०० घरे म्हाडाच्या हाती आली आहेत. महाराष्ट्रात राष्टपती राजवट असली तरी म्हाडाला लॉटरी काढण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे मुंबईसह कोकणातील नागरिकांना म्हाडाने ६ हजार ५०० घरांचा नजराणा आणला आहे.

हेही वाचा -मुलुंडमध्ये रेशन दुकानात निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप

नवी मुंबईतील घणसोली येथे ४० घरे, वसई येथील वळीव येथे १५ घरे, ठाण्यातील मोगरा पाडा, खोणी, शिरढोण (कल्याण) येथे एकूण ५ हजार घरे म्हाडाला उपलब्ध झाली आहेत. एकूण ६ हजार ५०० घरांच्या लॉटरीची तय्यारी सुरु केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

हेही वाचा -मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पेपर तपासणीची कामे द्या, भाजप शिक्षक आघाडीची मंडळाकडे मागणी

लोढा बिल्डरने कल्याण येथे सरकारच्या जागेवर गृहनगरी "पलावा सिटी"हा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पातील सरकारचा वाटा म्हणजेच २० घरे कायद्यानुसार लोढा बिल्डरने म्हाडाला दिली या २० टक्क्यातील धरणाची लॉटरी २०१८ मध्ये झाली. ठाणे, कल्याण येथील मौजे खोणी हेदुटने, भंडार्लि या भागात ही घरे आहेत.


कोकण मंडळाच्या या घरांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या लॉटरीत घरांचा ताबा वेगात देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असतानाच म्हाडा पुन्हा ६ हजार ५०० घरांची भेट नागरिकांना देत असल्याने मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, भिवंडी, शहापूर, या भागातील नागरिकांना या लॉटरीच्या लाभ होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details