महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 1, 2019, 10:01 PM IST

ETV Bharat / state

गणेशोत्सवामध्ये धोकादायक पूलावरुन वाहतूकीचा निर्णय संयुक्त पाहणीनंतर - महापौर महाडेश्वर

या वर्षी हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्यावर पालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता मुंबईमधील 29 पूल धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याचे समोर आले आहे. या पुलांपैकी 8 पूल पाडण्यात आले असून 12 पूलांचा वापर बंद करण्यात आला आहे.

विश्वनाथ महाडेश्वर, महापौर मुंबई

मुंबई- शहरात सध्या अनेक पूल धोकादायक झाले आहेत. या पूलांवरून श्रीगणेशाच्या मिरवणूका तसेच मूर्ती घेऊन जाणारी वाहने जाण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने आढावा बैठकीत केली होती. त्यावर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त पाहणी करूनच वाहतुकीचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

विश्वनाथ महाडेश्वर, महापौर मुंबई

मुंबईत गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या आधी व अनंत चतुर्थी दिवशी गणेश आगमन तसेच विसर्जनाच्या दिवशी मोठ्या मिरवणुका निघतात. त्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झालेले असतात. मोठ-मोठ्या वाहनांचाही त्यामध्ये सहभाग असतो. या वर्षी हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्यावर पालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता मुंबईमधील 29 पूल धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याचे समोर आले आहे. या पुलांपैकी 8 पूल पाडण्यात आले असून 12 पूलांचा वापर बंद करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालिका मुख्यालयात गणेशोत्सवासंदर्भात समन्वय समिती, वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयोजित केली होती. या बैठकीत समन्वय समितीद्वारे मुंबईमधील धोकादायक पुलांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

१० ऑगस्टपूर्वी बुजवणार खड्डे -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील रस्त्यानावर असलेल्या खड्डयांचा विषय आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आला. खड्डयांमुळे श्रीगणेशाच्या मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता उपस्थित करण्यात आली. त्यावर रस्त्यांवर पडलेले खड्डे 10 ऑगस्टपूर्वी बुजववावेत, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती महापौर महाडेश्वर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details