महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Awareness : रॅप सॉंग द्वारे केली जाणार गोवरबाबत जनजागृती

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गोवर या आजाराबाबत समाजात जागरूक्ता निर्माण करण्यासाठी आता रॅपरची मदत घेऊन, रॅप सॉंग मार्फेत जनजागृती (Measles awareness to be done through rap song) केली जाणार असल्याची माहिती, पालिकेच्या (initiative of Mumbai Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

By

Published : Nov 27, 2022, 8:06 PM IST

Measles Awareness
गोवरबाबत जनजागृती

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण २९२ रुग्णांची, ३९४७ संशयित रुग्णांची तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गोवरचा प्रसार वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम लोक प्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांची मदत घेतली आहे. त्यानंतर आता रॅपरची मदत घेऊन, रॅप सॉंग मार्फेत जनजागृती (Measles awareness to be done through rap song) केली जाणार असल्याची माहिती, पालिकेच्या (initiative of Mumbai Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

प्रतिक्रिया देतांना प्रतिनिधी अजय कुमार जाधव

रॅप सॉंग द्वारे जनजागृती :मुंबईत गेल्या दोन महिन्यात गोवर संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत आणि मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. विशेष करून हे रुग्ण मुस्लिम वस्ती, अस्वच्छता असलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या या ठिकाणी आढळून येत आहेत. मुस्लिम वस्त्यांमध्ये गोवरची लस घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांची बैठक घेतली होती. गोवर पसरलेल्या विभागातील नागरिकांना या बैठकीत नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. रजा अकादमी या संस्थेद्वारे गोवरबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. जनजागृती आणखी चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून रॅप सॉंग आणि व्हिडीओ बनवले जाणार आहेत. त्यासाठी रॅपरची मदत घेतली जाणार आहे. रॅपरद्वारे बनवले गेलेले व्हिडिओ पालिकेच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. तसेच हे व्हिडिओ गोवर पसरलेल्या विभागात सोशल मीडियावर पाठवले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.



महिनाभर मुलांची घ्या काळजी :मुंबईत सप्टेंबर ऑक्टोबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. लसीकरण झालेले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया आदी कारणामुळे रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गोवर हा आजार प्रतिकार शक्ती कमी झाल्यावर होतो. हा आजार झालेल्या मुलाची रोग प्रतिकार शक्ती आणखी कमी झालेली असते. गोवर मधून बरे झाल्यावर त्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती पुन्हा निर्माण होण्यास महिनाभराचा कालावधी लागतो. या दरम्यान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मुलांकडे या महिनाभरात काळजी घेतली गेली नाही तर, त्यांना पुन्हा आजार होऊ शकतात अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.



१३ रुग्ण ऑक्सिजनवर, ५ आयसीयुमध्ये :मुंबईत ५१ लाख ६ हजार १७४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३९४७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले २९२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३२० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ११४ बेडवर रुग्ण असून २०६ बेड रिक्त आहेत. १३६ जनरल बेडपैकी ९६, १४९ ऑक्सीजन बेड पैकी १३, ३५ आयसीयु बेड पैकी ५ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून आज एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १२ हजार १४८ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख ३४ हजार ८३३ मुलांना लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ ठिकाणी गोवरच्या पॉजीटीव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे. अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ३४९६ बालकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.



मुंबईत १० तर बाहेरील ३ मृत्यू :मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १० मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. २ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल, त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.



या उपाययोजना :गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन 'अ' दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते, तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन 'अ' देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर, मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details