महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Marath Reservation Formula: हिंसेनंतरही 'त्यांना' आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांना मिळणार का? हरिभाऊ राठोडांचा सवाल - Maratha Reservation

Marath Reservation Formula: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दुसऱ्या टप्प्यात केलेल्या उपोषणाच्या वेळी राज्यात विविध भागात हिंसक आंदोलनं करण्यात आली. याआधी देखील देशातील अनेक राज्यात आरणक्षासाठी हिंसक आंदोलनं झाली; मात्र त्यांना अद्याप आरक्षण मिळालेलं नाही. (Haribhau Rathod On Maratha Reservation) त्यामुळं मराठ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना आरक्षण मिळेल का? यावर चर्चा होत असून मतमतांतरे आहेत, असं मत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड (reservation expert Haribhau Rathod) यांनी मांडलं.

Marath Reservation Formula
हरिभाऊ राठोड

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 10:04 PM IST

हरिभाऊ राठोड

मुंबईMarath Reservation Formula:सध्या राज्यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी रान उठवलं आहे. सरकारनं त्यांंना आरक्षणाचं आश्वासन दिलंय. पण यासाठी काही मुदत मागितली आहे. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येनं शांततेच्या मार्गानं मोर्चे निघाले, पण जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील केलेल्या उपोषणावेळी राज्यात विविध भागात हिंसक आंदोलनं करण्यात आलं. यावेळी मराठा समाजानं आक्रमक होत जाळपोळ, तसेच मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यामुळं मराठ्यांनी शांततेत काढलेले मोर्चे आणि आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागलं. (Maratha Reservation Issue)

'या' समाजाला आरक्षणाच्या आंदोलनात अपयश:पंजाब-हरियाणामध्ये जाट समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात जाट समाजानं रस्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी केली होता. परंतु, त्यानंतरही या समाजाला आरक्षण मिळालं नाही. यानंतर गुजरातमध्ये देखील पाटीदार आणि गुर्जर समाजानं आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं होतं. आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं याची दखल तत्कालीन सरकारला घ्यावी लागली होती आणि सरकार अडचणीतसुद्धा आलं होतं. तरी देखील या समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही. दरम्यान, "महाराष्ट्र वगळता इतर राज्यात जाट, पाटीदार, गुर्जर समाजानं आक्रमक आणि हिंसक आंदोलनं केली. मात्र, त्यांना अद्याप आरक्षण मिळालं नाही. महाराष्ट्रात सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं खरोखरंच मराठ्यांना आरक्षण मिळेल का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे", असं आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड म्हणाले.

तर मराठ्यांना नक्कीच आरक्षण मिळेल: "आरक्षणासाठी देशात अनेक आंदोलनं झालीत. हिंसक आंदोलनंसुद्धा झाली, पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. आपण नेहमी म्हणतो की, हार्दिक पटेलचं काय झालं? तशी वेळ मनोज जरांगे पाटलांवर येऊ नये. एवढ्या उंचीवर त्यांनी जे आंदोलन नेऊन ठेवलंय त्याला अपयश येऊ नये. सध्या मराठा आरक्षणाचा काटा रुतला आहे तो निवडणुकी आधी आणि नंतरही सलत राहणार. त्यामुळं यावर तोडगा काढायचा असेल तर जरांगे पाटील आणि सरकारनं एकत्र येऊन कायदेशीर चर्चा केली पाहिजे. कायद्यात बसणारं आरक्षण कसं मिळू शकेल, याचा माझ्याकडं फॉर्म्युला आहे. ओबीसींची सब-कॅटगेरी म्हणजे काय? जस्टीस रोहिणी आयोग म्हणजे काय? हे समजून घेतलं तर नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकेल", असा दावा हरिभाऊ राठोडांनी केलायं.

हेही वाचा:

  1. Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; गावी जाणार मात्र, घरी जाणार नाही
  2. Maratha Reservation : 'माधव' फॉर्म्युलानं मराठा समाजाला 50 टक्क्यांतच आरक्षण देणं शक्य- माजी खासदार हरिभाऊ राठोड
  3. Manoj Jarange Patil : दिवाळीत नेत्यांच्या घरी फराळाला गेल्यावर त्यांना 'हे' विचारा, मनोज जरांगे यांचं आवाहन काय?

ABOUT THE AUTHOR

...view details