मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्तिथीत नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित 'महाजानदेश यात्रे'चा समारोप होणार आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. तर 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : गणेश नाईकांचा 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या व दुस-या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक, महिला आणि अल्पसंख्यांकांशी संवाद साधला. 2 टप्प्यात झालेली महाजनादेश यात्रा राज्यातील 24 जिल्ह्यातील 106 विधानसभा मतदारसंघातून पार पडली. सरकारच्या 5 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.