महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 27, 2022, 3:39 PM IST

Updated : Dec 27, 2022, 11:09 PM IST

ETV Bharat / state

Look Back 2022 : कायदेशीरदृष्ट्या चांगलेच गाजले 2022 वर्ष, पाहा कोणते होते या वर्षातील गाजलेले मोठे खटले

राज्याच्या दृष्टीने 2022 हे वर्ष चांगलेच वादग्रस्त ( Maharashtra courtrooms ) ठरले. या वर्षात अनेक कायदेशीर ( Legal Year Ender 2022 ) प्रकरणामुळे 2022 हे वर्ष अनेक अर्थाने गाजले. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळ्याच्या ( Political Clashes In Year 2022 ) आरोपांवरुन अटक, मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रींग प्रकरणात अटक, माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांचे 100 कोटीच्या वसुली प्रकरण (Look Back 2022) आणि खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हनुमान चालिसा ( Many Storm In Maharashtra courtrooms ) प्रकरणाने देश ढवळून निघाला.

Look Back 2022
संपादित छायाचित्र

मुंबई -राज्यात 2022 हे वर्ष अनेक वादाने ( Legal Year Ender 2022 ) चांगलेच गाजले आहे. न्यायालयीन दृष्टीनेही या वर्षात चांगलेच उलटफेर ( political slugfests in Maharashtra courtrooms ) केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत पत्राचाळ घोटाळा ( Maharashtra courtrooms ) , मंत्री नवाब मलिक दाऊद संबंध, नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा वाद ( Political Clashes In Year 2022 ) या सगळ्या कायदेशीर प्रकरणामुळे 2022 हे (Look Back 2022) वर्ष चांगलेच चर्चेत राहिले. यातील अनेक जणांच्या मागील कायद्याचा ( Many Storm In Maharashtra courtrooms ) ससेमिरा अद्यापही संपलेला नाही.

  1. एल्गार परिषद प्रकरणकोरेगाव भीमा येथे भरलेल्या एल्गार परिषद ( Elgar Parishad ) प्रकरण देशभर चर्चेत राहिले. नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधावरुन एल्गार परिषदेचे अनेक नेते केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या रडावर होते. मात्र यातील अनेकांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
  2. नवाब मलिक मनी लँड्रींग आणि दाऊद संबंध प्रकरणराष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Money Laundering Case ) यांनी खरेदी केलेली जमीन प्रकरणी ईडीने मार्चमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक करुन या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर नवाब मलिक यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत ( Underworld Don Dawood Ibrahim ) संबंध असल्याच्या संशयावरुन त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यामुळे नवाब मलिक यांचा जामीन पीएमएलए न्यायालयाकडून ( Many Storm In Maharashtra courtrooms ) नाकारण्यात आला. सध्या नवाब मलिक हे मनी लँड्रींग प्रकरणात कोठडीत आहेत. त्यांच्या या प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली. मात्र तरीही राष्ट्रवादीने त्यांचा राजिनामा न घेतल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
  3. नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा वादअमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा वादाने ( Hanuman Chalisa raw ) देशभर खळबळ उडवली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray ) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार केल्याने त्यांना महाविकास आघाडी सरकारने ( Many Storm In Maharashtra courtrooms ) एप्रिल महिन्यात अटक केली. दहा दिवसाच्या कोठडीनंतर राणा दाम्पत्याने न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र या प्रकरणाने देशभरातील वातावरण ढवळून निघाले.
  4. संजय राऊत पत्राचाळ जमीन घोटाळाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहतात. मात्र पत्राचाळ जमीन घोटाळ्यात ईडीने संजय राऊत यांना जुलै महिन्यात अटक केल्याने देशभर खळबळ उडाली. या प्रकरणाने संजय राऊत ( Political Clashes In Year 2022 ) यांची चांगलीच नाचक्की झाली. मात्र विरोधकांनी आपल्यावर सूड उगवण्यासाठी हा आरोप केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात संजय राऊत ( Many Storm In Maharashtra courtrooms ) यांचा सहभाग नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत त्यांना 100 दिवसानंतर जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना संजय राऊत यांना काही अटी शर्थी घालून दिल्या आहेत.
  5. अनिल देशमूख 100 कोटी वसुली प्रकरणमाजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh Extortion Case ) यांना कथित 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीने ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. याप्रकरणात अनिल देशमुख ( Political Clashes In Year 2022 )यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला दर महिन्यात बार चालकांकडून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Param Bir Singh Allegation ) यांनी पत्राद्वारे केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनेही गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. न्यायालयाने अनिल देशमुख यांना वसुली ( Many Storm In Maharashtra courtrooms ) प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत दिली आहे. या प्रकरणानेही देशभर खळबळ उडवून दिली आहे.
  6. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणबहुचर्चीत मालेगाव बॉम्ब ब्लास्ट ( Malegaon Bomb Blast Case ) प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ( Sadhvi Pragya Singh Thakur ) यांचे नाव आल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरणही 2022 मध्ये चांगलेच गाजले. त्यातील साक्षिदारांनी आपला जबाब बदलल्याने या प्रकरणातील तपासी अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरण आणि शिना बोरा प्रकरण हे या वर्षीही सुरूच आहेत.
  7. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांचे वादग्रस्त निकालमुंबई उच्च न्यायालयाच्या ( Bombay High Court ) नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला ( Justice Pushpa Ganediwala) यांच्या अनेक धक्कादायक निर्णयांनी 2022 हे वर्ष चांगलेच गाजले. त्यांच्या स्कीन टू स्कीन या पोक्सो खटल्यातील निर्णयाने तर चांगलीच खळबळ उडवली होती. याप्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयातील ( Many Storm In Maharashtra courtrooms ) कलेजियमने पुष्पा गणेडीवाला यांना कायमस्वरुपी न्यायाधिश ठेवण्याची शिफारस मागे घेतली.
  8. गौतम नवलखा नजरकैदेतएल्गार परिषदेतील संशयीत आरोपी गौतम नवलखा ( Gautam Navlakha ) यांना नक्षलवादी ( Political Clashes In Year 2022 ) संबंध असल्याच्या कारणाने अटक करण्यात आली होती. त्यांच्या कुटंबियांनी त्यांना पाठवलेले पी जी वुडहाऊस यांचे विनोदी पुस्तक त्यांना देण्यास तरुंग प्रशासनाने देण्यास नकार दिल्याने न्यायालय ( Many Storm In Maharashtra courtrooms ) चांगलेच खवळले. याप्रकरणी एप्रिल 2022 मध्ये उच्च न्यायालयाने प्रकृतीचे कारण देत गौतम नवलख्खा यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवल्याने गौतम नवलखा यांच्या कारागृहातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.
  9. अभिनेता सलमान खानची उच्च न्यायालयात धावएका पत्रकाराला धक्काबुक्की केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान ( Actor Salman Khan ) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने ( Many Storm In Maharashtra courtrooms ) सलमान खानला समन्स पाठवले होते. त्यामुळे सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने सलमान खानविरोधातील समन्सवर स्टे दिला होता.
  10. एल्गार परिषदेतील आरोपींचा जामीन फेटाळला एल्गार परिषदेतील आरोपी वरवरा राव अरुण फरेरा आणि वर्नण घोंसालवीस यांनी तांत्रिक कारण देत उच्च न्यायालयात ( High Court Reject Bail To Varvara Rao ) जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला.
  11. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणदादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर ( Mohan Delkar Suicide Case ) यांनी सप्टेंबर महिन्यात मुंबईत आत्महत्या केली होती. याप्रकरणी दादरा नगर हवेलीच्या प्रशासकासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप खासदाराने आत्महत्या केल्याचे हे प्रकरण होते. त्यामुळे महाविकास आघाडीने ( Maha Vikas Aghadi ) या प्रकरणावर भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणी ( Many Storm In Maharashtra courtrooms ) दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात ओढूनताणून आरोप लावण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
  12. नारायण राणेंच्या बंगल्याचे बांधकाम पाडण्याचे आदेशकेंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी जुहू समुद्र किनारी बांधलेल्या अधिश या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात मुंबई महापालिकेने ( Political Clashes In Year 2022 ) हे बांधकाम पाडण्यासाठी राणेंना नोटीस जारी केली होती. मात्र नारायण राणे यांनी सप्टेंबर महिन्यात उच्च न्यायालयात ( Many Storm In Maharashtra courtrooms ) धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने राणे यांच्या बंगल्यातील बांधकामात नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे नमूद केले. त्यासह मुंबई महापालिकेला राणेंचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेशही दिले.
Last Updated : Dec 27, 2022, 11:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details