महाराष्ट्र

maharashtra

राज्यातील लॉकडाऊनमध्ये १५ दिवसांची वाढ, १६.६६ टक्के नागरिकांचे लसिकरण झाले

By

Published : May 30, 2021, 9:29 PM IST

Updated : May 31, 2021, 2:39 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आणखी 15 दिवसांसाठी निर्बंध कायम करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच तौक्ते चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

lockdown increase by 15 days in maharashtra
राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांची वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. त्याचा कालावधी संपत आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आणखी 15 दिवसांसाठी निर्बंध कायम करण्यात आले असल्याची माहिती दिली. दरम्यान, भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी बंधने पाळल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

'वादळाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज'

निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा तौक्ते चक्रीवादळ असेल ही वादळे नेहमीची झाल्याने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच नुकसान भरपाईचे निकष बदलवण्याची गरज असून त्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाकाळातील उपाययोजनेची दिली माहिती -

दरम्यान, कोरोना काळात 54 लाख शिवथाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा खात्यात 154 कोटी 95 लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर फेरीवाल्यांसाठी 52 कोटींची निधी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

'रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक' -

राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषता ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे. कारण दुसऱ्या लाटेत कोरोना झपाट्याने परसतो आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्याला दरदिवशी 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून राज्याची क्षमता 1200 मेट्रिक टन आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता ऑक्सिजन निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टास्क फोर्समध्ये बालरोगतज्ज्ञांचा समावेश-

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही तिसरी लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील टास्क फोर्समध्ये बालरोगतज्ज्ञांचा समावेश केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसचे काळ्या बुरशीच्या (म्यूकरमायकोसिस) तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेशदेखील या टास्क फोर्समध्ये केला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

'आतापर्यंत 2 कोटींच्यावर नागरिकांचे लसीकरण पूर्ण' -

राज्यातील लसीकरणाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी ही राज्याची असून त्यासाठी लागणारे 12 कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत 2 कोटींच्यावर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

'12वीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेणार' -

कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता राज्यसरकारने 10 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली. मात्र, 12 वीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 12 वीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या असतात त्यामुळे याबाबत केंद्राने धोरण ठरवायला पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - दहावी परीक्षा रद्दच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या धनंजय कुलकर्णींना धमकी

Last Updated : May 31, 2021, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details