महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 4, 2021, 8:36 PM IST

Updated : Apr 6, 2021, 10:59 PM IST

ETV Bharat / state

पुन्हा लॉकडाऊन केल्यास लाखो अकुशल कामगारांचा रोजगार बुडेल - आहार संघटना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईसह राज्यामध्ये कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लादले जातील, असा इशारा दिलेला आहे. यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाला तर मुंबईत असलेल्या रेस्टॉरंट व बार चालकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, असे आहार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

Unskilled Worker Employment Mumbai
अकुशल कामगार रोजगार मुंबई

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, गेल्या 2 दिवसांपासून नऊ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात शनिवारी 49 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर या संदर्भात प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊनचे निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईसह राज्यामध्ये कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लादले जातील, असा इशारा दिलेला आहे. यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाला तर मुंबईत असलेल्या रेस्टॉरंट व बार चालकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, असे आहार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

माहिती देताना आहारचे प्रमुख शिवानंद शेट्टी

हेही वाचा -राज्यातील १७ हजार बालकांना मिळणार १ हजार रुपयांचे अनुदान

मुंबईत 80 हजार हॉटेल, लाखो अकुशल कामगारांसाठी मोठा रोजगार

मुंबई शहरामध्ये 80 हजारांहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियर बार व इतर आस्थपणांची नोंद आहे. या मधील सर्वाधिक मोठी संघटना असलेल्या आहारचे प्रमुख शिवानंद शेट्टी यांनी म्हटले की, राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात असताना याला आमचा कडाडून विरोध असणार आहे. याचे कारण देताना शिवानंद शेट्टी म्हणतात की, मुंबई शहरात असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियर बारसारख्या माध्यमातून अकुशल कामगारांना एक मोठा रोजगार सध्याच्या घडीला मिळतो. याबरोबरच राज्य शासनाला 500 कोटी रुपयांचा महसूलसुद्धा मिळत असल्यामुळे लॉकडाऊन हा कुठल्याही परिस्थितीत राज्याला, हॉटेल क्षेत्राला परवडणारा नसल्याचे त्यांनी म्हटले.

केवळ 20 टक्के होत आहे व्यवसाय

शिवानंद शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, गेले 6 महिने हॉटेल इंडस्ट्री ही केवळ 20 टक्के व्यवसाय करत असून सकाळच्या सत्रात 10 टक्के व इतर वेळेत १० टक्के असे मिळून काम करत आहे. केवळ 20 टक्केच व्यवसाय होत असल्यामुळे कामगारांचे पगार, सरकारी कर सारख्या गोष्टी निघनेही आता कठीण होऊन बसले असल्याचे शिवानंद शेट्टी यांनी म्हटले. रेस्टॉरेंट, बियर बारसारख्या आस्थापनांकडून 8 लाख रुपयांचा लीकर परवान्याच्या संदर्भात कर भरला जातो, मात्र सध्या हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर असल्यामुळे लिकर परवान्याचा कर परतावा कसा करायचा? हा प्रश्न हॉटेल चालक व मालकांना पडलेला असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्य सरकारने नाईट कर्फ्यू घोषित केला असून रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बियर बार, हॉटेल्स, रेस्टॉरेंट सारखी आस्थापने आता बंद ठेवण्याच्या आदेश दिल्यानंतर आमच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला असल्याचे शिवानंद शेट्टी म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री आठ नंतरच बियरबार, हॉटेल्सचे व्यवसाय सुरू होतात. मात्र, याच वेळेत जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे एकंदरीत असंघटित कामगार, त्यांचा रोजगार, याबरोबरच हॉटेल चालक, मालकांच्या संदर्भातील विषय हा बिकट बनला आहे.

हेही वाचा -...अन्यथा सर्वसामान्यांसाठी होऊ शकतो लोकलचा दरवाजा बंद

Last Updated : Apr 6, 2021, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details