महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 20, 2023, 9:44 PM IST

ETV Bharat / state

Lack Of Roads In Rural Areas : पायाभूत सुविधांची ग्रामिण भागात वानवा

रस्त्याच्या सुविधा नसल्याने ग्रामीण भागात कृषी क्षेत्राचा, शेतकऱ्यांचा विकासाला बाधा येत आहे. केंद्र, सरकार तसेच राज्य सरकार पायाभूत सुविधाबाबत ग्रामीण क्षेत्राला कमी प्राधाण्य देत असल्याचे आढळुन येत आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असतांना देखील ग्रामीण भागात अजाही रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडलेले नाहीत.

Lack Of Roads In Rural Areas
Lack Of Roads In Rural Areas

मुंबई -महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असे स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी म्हटलं होतं. त्यानंतरच्या पहिला शासनाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात काही पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून योजना सुरू केल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले. मात्र, अद्यापही ग्रामीण भाग रस्त्यांच्या जाळ्यापासून काही ठिकाणी खूप दूर असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कृषी क्षेत्राचा, शेतकऱ्यांचा विकास अपेक्षित होत नाही. शासनाच्याच पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या माहितीमधून ही बाब समोर येते.


अद्यापही ग्रामीण भागात रस्त्याची वनवा - राज्यातील मुख्यतः महानगर छोटी शहर, जिल्ह्याचे ठिकाण, तालुक्याचे ठिकाण या ठिकाणी रस्ते काहीसे ठीक आहेत. तर, मेट्रो शहरांमध्ये अत्यंत वेगवान आहे. रस्ते खराब झाले की रस्ते दुरुस्ती पटकन केली जाते. मात्र जिल्ह्याचे रस्ते, तालुक्याचे रस्ते यांची दुरुस्ती तितक्या वेगाने होत नाही. महाराष्ट्रामध्ये तर अनेक शेकडो खेडे आहेत की जिथपर्यंत अद्यापही पक्के रस्ते शासनाचे पोचलेले नाही.




कोकण विभाग -कोकण विभागामध्ये खेडे पक्क्या रस्त्याने जोडले गेलेले नाही. अशा, एकूण खेड्यांची संख्या ही 65 आहे. तर बारावी महिने सर्व मौसमामध्ये सर्व गावे वस्त्या एकमेकांशी जोडलेले असतात असे कोकण विभागामध्ये 4 हजार 633 रस्ते आहेत. तर, पावसाळ्यात 52 रस्त्यांचा संपर्क तुटलेले असतो. तसेच 15 रस्ते असे आहेत की बाराही महिने त्यांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क नसतो. 15 खेडे असे आहेत त्यांचा आजही तालुक्याशी संपर्क नाही.

नाशिक विभाग - नाशिक विभागामध्ये 6 हजार 607 एकूण खेडे आहेत. त्यापैकी सर्व मौसमामध्ये रस्ते चांगल्या स्थितीत असतात अशा रस्त्यांची संख्या 6 हजार 501 अशी आहे. तर पावसाळ्यात संपर्क तुटलेल्या खेड्यांची संख्या 65 इतकी आहे. 41 खेड्यांमध्ये बिलकुल पक्के रस्ते नाहीत.

पुणे विभाग - पुणे या विभागामध्ये एकूण 6 हजार 650 खेड्यांची संख्या आहे. या एकूण खेड्यांपैकी 6 हजार 594 बारा रस्ते चांगले आहेत. 23 खेड्यांचा खराब हवामानाच्या काळात पक्के रस्ते नसल्यामुळे संपर्क तुटतो. तर, 33 खेडे हे पक्क्या रस्त्यांशी जोडले गेलेले नाही.

औरंगाबाद विभाग - औरंगाबाद विभागात एकूण 8 हजार 371 खेडे आहेत. त्यापैकी 8 हजार 365 खेडे पक्क्या रस्त्यांनी जोडलेले आहेत. मुख्य रस्त्यांनी जोडले नाही अशा खेड्यांची संख्या 6 आहे. औरंगाबाद विभागात एकही गाव असे नाही जिथे कच्चे रस्ते आहेत. या विभागात सर्वाधिक गावातील रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडलेले आहे, असे शासनाच्याच 2022 च्या पायाभूत सुविधा अहवालात नमूद आहे.

नागपूर विभाग - नागपूर विभागात सुमारे 7 हजार 961 खेडे आहेत. त्यापैकी 67 खेड्यात पक्के रस्ते नाहीत. शिवाय 223 खेड्यात पावसाळ्यात रस्त्याचा संपर्क तुटतो.

अमरावती विभाग -अमरावती विभागात 6 हजार 352 खेडे आहेत. त्यापैकी 6 हजार 328 गावे मुख्य रस्त्याशी जोडलेले आहे. 5 गावांचा पावसाळ्यात मुख्य रस्त्याशी असणारा संपर्क तुटतो. तर, 19 खेड्यात आजही पक्क्या रसत्याचा अभाव आहे.

या बाबत आप पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी सांगितले की, 'केंद्र शासन, राज्य शासन केवळ महानगर, मुख्य शहरांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष देते. मात्र, खेडे पायाभूत सुविधा पासून लांब आहेत. परिणामी ग्रामीण भागात चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा नाहीत. त्यामुळे मोदी, शिंदे-फडणवीस सरकारने विदर्भ खानदेश मराठवाडा ह्या भागातील खेड्याकडे लक्ष देण्याची गरज' असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details