मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात विवादास्पद टिप्पणी करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पायधुनी पोलिसांकडून चौकशी कामी समन्स बजावण्यात आले आहे. याविरोधात तातडीची याचिका अर्णब गोस्वामी यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणीदरम्यान कुठलाही दिलासा अर्णब गोस्वामी यांना देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या तर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला होता. ज्यात म्हणण्यात आले होते की, पायधुनी पोलीस ठाणे हे कंटेनमेंट परिसरामध्ये येत असून एकाच प्रकरणात अनेक गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे याबाबत स्पष्ट आदेश असल्यामुळे याबद्दल न्यायालयाने हस्तक्षेप करावा, म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती.