महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले हे जगाला सांगण्याची गरज काय होती - जितेंद्र आव्हाड - नरेंद्र मोदी

मोदी खरा जातीभेद मानत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा तो अपमान आहे. ही देशाला मान खाली घालणारी घटना असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Feb 25, 2019, 2:39 PM IST

Updated : Feb 25, 2019, 4:05 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यानंतर त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवत त्यांचा सत्कार केला आणि तो फोटो सोशल मीडियावर वायरल केला. या एकंदरीत प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चातुर्वर्ण्य मानसिकतेचे असून जातीयवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
कुंभमेळ्यात स्वच्छतेचे काम करून कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. त्यामुळे त्यांची सेवा करणे हे मी भाग्य समजतो, असे मोदींनी म्हणाले. कुंभमेळा परिसरात स्वच्छता राखणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांचा मोदींनी पाय धुऊन सत्कार केला. सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले हे जगाला सांगण्याची गरज काय होती, असा सवालही आव्हाड यांनी केला. मोदी खरा जातीभेद मानत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा तो अपमान आहे. ही देशाला मान खाली घालणारी घटना असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 25, 2019, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details