मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत राज्यातील ७ मतदारसंघात १४७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. त्यापैकी ३१ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली आहेत. तर ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारिख २८ मार्च होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.
मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या