महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आरोपी अर्णब गोस्वामी बातमी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी अर्णब गोस्वामी सध्या जामिनावर बाहेर आहे. उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अलिबाग न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा कायम ठेवली आहे.

Arnab Goswami
अर्णब गोस्वामी

By

Published : Apr 10, 2021, 9:31 AM IST

मुंबई -अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अलिबाग न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा अर्णबला मिळाली आहे.
इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार अर्णब गोस्वामीला दिलेली सवलत कायम ठेवली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

मे 2018 मध्ये झालेल्या अन्वय नाईक आत्महत्ये प्रकरणी फिरोज शेख आणि नितीश शारदा यांच्यासमवेत गोस्वामीवर आरोप आहेत. थकबाकी न मिळाल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींवर नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित एफआयआर रद्द करावा यासाठी तिन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर 23 एप्रिलला सुनावणी करू, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी गोस्वामीला अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

काय आहे प्रकरण -

अर्णब गोस्वामी यांनी पैसे दिले नाही म्हणून अन्वय नाईक या इंटीरियर डिझायनरने 2018 मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्या करताना रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव चिट्ठीमध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतरही अर्णब यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नी व मुलीने केला होता. त्यानुसार सीआयडी चौकशी करून अर्णबला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details