महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​Governor Ramesh Bais : मॅरेथॉनमुळे मुंबईने जपली दातृत्व संस्कृती; राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन - Tata Mumbai Marathon Philanthropy Night Awards

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मॅरेथॉनच्या माध्यमातून आपले दातृत्व संस्कृती जपली, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. 'टाटा मुंबई मॅरेथॉन फिलांथ्रोपी नाईट अवॉर्ड्स 2023' पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

​Governor Ramesh Bais
राज्यपाल रमेश बैस

By

Published : Mar 22, 2023, 4:23 PM IST

मुंबई : जानेवारीत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी निधी संकलन करणाऱ्या अशासकीय व सेवाभावी संस्था तसेच वैयक्तिक निधी संकलन केलेल्यांचा 'टाटा मुंबई मॅरेथॉन फिलांथ्रोपी नाईट अवॉर्ड्स 2023' देऊन सत्कार राज्यपालांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मॅरेथॉनच्या माध्यमातून आपले दातृत्व संस्कृती जपली, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात केले.


काय म्हणाले राज्यपाल बैस : राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दानशूर लोकांचे देखील शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक उपक्रमांकरिता मोठ्या प्रमाणात निधी जमा केला जातो. मुंबईची दातृत्व संस्कृती पुनश्च अधोरेखित झाली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये मुंबई मॅराथॉन देशातली सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन झाली आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 55000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धेच्या लोकप्रियतेची पोचपावती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

खेळाडू देशाचे नाव मोठे करतील :यंदा 252 सेवाभावी संस्था, 177 कॉर्पोरेट्स, 1000 वैयक्तिक निधी संकलक, 17000 दानशूर व्यक्ती यांसह 10000 स्पर्धकांनी विविध समाजकार्यांकरिता निधी संकलित केला. मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाला उत्तम धावपटू व खेळाडू मिळतील व ते देशाचे नाव मोठे करतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. मुंबई मॅरेथॉनमुळे भारताचे नाव जगातील मॅरेथॉनच्या नकाशावर आल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.


प्रकाशाची ज्योत तेवेल : मॅरेथॉनच्या माध्यमातून यंदा आरोग्य, शिक्षण, प्राणी कल्याण,​​ पर्यावरण, महिला सबलीकरण, आदी क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी 40.68 कोटी रुपये जमा झाले आहेत. या मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीपासून आजवर 357 कोटी जमा झाल्याचे सांगत राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील अज्ञात दिव्यांग, अपंग, निराधार, व इतर गरीब व गरजू लोकांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत तेवेल, असे राज्यपालांनी म्हटले.

पुरस्कार वितरण सोहळा : राज्यपालांच्या हस्ते सेवाभावी संघटनेसाठी अधिकाधिक निधी संकलित केल्याबद्दल राजचंद्र लव्ह अँड केअर, 'युनायटेड वे मुंबई' व सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट या संथांच्या प्रतिनिधींचा सत्कार केला. वैयक्तिक निधी संकलना करिता श्याम जसानी, मनीषा खेमलानी, सदाशिव राव व नव्या आणि गगन बंगा यांना 'चेंज लेजंड' पुरस्काराने सन्मानित केले.

मान्यवरांची उपस्थिती : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट, प्रोकॅम इंटरनॅशनलचे अनिल सिंह आणि विवेक सिंह, युनायटेड वे मुंबईचे मुख्याधिकारी जॉर्ज आईकरा व इतर निमंत्रित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.

हेही वाचा : Gudhi Padva 2023: नवं वर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री सहभागी, जनतेल्या दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details