महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 18, 2019, 7:39 AM IST

ETV Bharat / state

गोरक्षा, समाजसेवा अन् भव्य मंदिर निर्माण हीच आमची पुढील वाटचाल - मिलिंद परांडे

गोरक्षा हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर विश्व हिंदू परिषद आता पुढे काम करणार आहे, असे आज पत्रकार परिषदेत  परांडे यांनी सांगितले.

विश्व हिंदू परिषद

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिराचा विषय संपला आहे. त्यामुळे आमची पुढची वाटचाल ही गोरक्षा, समाजसेवा, आरोग्य सेवा, तसेच भव्य मंदिर निर्माण या विषयावर असणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली.


अनेक वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित होता. त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता हिंदू समाजात ज्या समस्या आहेत. त्या सोडविण्याकडे विश्व हिंदू परिषद लक्ष देईल. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेने देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदतीसाठी सायन येथे आरोग्य केंद्र उभारले आहे. तसेच गोरक्षा हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर विश्व हिंदू परिषद आता पुढे काम करणार आहे, असे आज पत्रकार परिषदेत परांडे यांनी सांगितले.

दरम्यान मुस्लीम बोर्डला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ३ महिन्यात राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास परांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details