महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ravi Raja reacted on BMC Budget 2023: दोन वर्षानंतर मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प तुटीत जाईल, रवी राजा यांनी व्यक्त केली भीती - BMC Budget 2023

मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी ४५ हजार कोटींचा तर २०२३-२४ साठी ५२ हजार ६१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात आयुक्तांनी १५ हजार कोटी रुपये राखीव निधीतून काढणार असल्याचे म्हटले आहे. असेच सुरू राहिले तर येत्या दोन वर्षानंतर मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प तुटीत जाईल, अशी भीती पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.

Ravi Raja reacted on BMC Budget 2023
रवी राजा

By

Published : Feb 4, 2023, 9:33 PM IST

रवी राजा मुंबई महापालिका अर्थसंकल्पावर बोलताना

मुंबई :पालिकेचा २०२३-२४ चा मागील वर्षापेक्षा ७ हजार कोटी रुपयांची वाढ असलेला ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. २०२२- २३ चा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मागील वर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे १४.५० टक्के इतकी वाढ झाली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना २०२३-२४ च्या आर्थिक वर्षांत ८६६३.०६ कोटी तर तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण निधीमधून ५९७० कोटी रुपये असे एकूण १४,६३३.०६ कोटी रुपये काढले जाणार असल्याचे सांगितले. मार्च २०२३ पर्यंत तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण निधीमधून २३८० तर २०२३-२४ मध्ये ५९७० कोटी रुपये निधी उभारण्याचे प्रस्तावण्यात आले आहे. मुंबईकरांचा पैसे त्यांच्यासाठी वापरला जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.


अर्थसंकल्प तुटीत जाईल :मुंबई महापालिकेचे ८८ हजार कोटी रुपये बँकेमध्ये आहेत. यातील ४० हजार कोटी रुपये कंत्राटदारांना परत द्यावे लागणार आहेत. २५ हजार कोटी रुपये कर्मचारी अधिकारी यांचे ग्रॅच्युइटी आणि पेंशन देण्यासाठी लागणारा निधी आहे. या निधीला कोणीही हात लावू शकत नाही. उर्वरित २० हजार कोटींमधून १५ हजार कोटी रुपये काढण्यात आल्याने केवळ ५ हजार कोटी रुपये राखीव निधीमध्ये शिल्लक राहणार आहे. आयुक्त स्वतः पालिकेचा महसूल कमी झाल्याचे बोलत आहेत. यावरून येत्या दोन वर्षानंतर पालिकेचा अर्थसंकल्प तुटीत जाईल, अशी भीती रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.


आयुक्त सरड्याप्रमाणे रंग बदलतात :मागील सरकारच्या काळात पालिका आयुक्त बँकेतील निधी वाढल्याने आपली पाठ थोपटून घेत होते. सरकार बदलताच आयुक्त हा पैसा नागरिकांचा आहे, तो त्यांच्यासाठी खर्च करणे गरजेचा असल्याचे बोलत आहेत. पालिका आयुक्त सरड्यासारखे रंग बदलतात, आयुक्त मुंबईकरांना दिवसाची स्वप्ने दाखवत आहे, अशी टीका रवी राजा यांनी केली. पालिका आयुक्तांनी उत्पन्नाचे स्रोत कसे वाढतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुंबईकरांना जे गरजेचे आहेत त्यावरच खर्च करा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

पालिकेचा अर्थसंकल्प वाढला :देशातील सर्वांत मोठी महानगर पालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा २०२३-२४ चा मागील वर्षांपेक्षा ७ हजार कोटी रुपयांची वाढ असलेला ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. २०२२-२३ चा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सदा करण्यात आला होता. मागील वर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे १४.५० टक्के इतकी वाढ झाली आहे.

हेही वाचा :Aaditya Thackeray Challenged CM : मुख्यमंत्री शिंदेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; आदित्य ठाकरेंचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details