मुंबई : पोलीस भरतीसाठी शासनाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस भरतीसाठीचे पोर्टल धड चालत नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती. यावर उपाय म्हणून गृहमंत्रालयाने पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत ( applications for MH police recruitment ) वाढवून दिलेली आहे. आता उमेदवार 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. मात्र शासनाचे महाआयटी या घोटाळेबाज कंपनीवर ( Students displeasure on Maha IT ) प्रेम का असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
महाराष्ट्र शासनाने महा रोजगार मेळावा आयोजित ( Maha Rozgar Mela ) केला आणि वर्षाला 75 हजार रोजगार उपलब्ध करू अशी घोषणा केली. राज्यामध्ये एकूण तीन लाख सरकारी नोकर भरतीची ( government portal ) गरज आहे. सर्वांच्या दबावामुळे शासनाने पोलीस भरती संदर्भात निर्णय जाहीर ( government portal related to police recruitment ) केला. मात्र पोलीस भरती संदर्भातील शासकीय पोर्टल धड चालत नव्हते. उमेदवारांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीच्या अर्ज भरण्याची मुदत ( deadline for filling police recruitment applications ) वाढवून दिली आहे.
महाआयटी कंपनीलाच काम देण्याचे कारण कायस्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे समन्वयक राहुल गोठेकर यांनी सांगितले की,'विद्यार्थी शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे ओळखपत्र शालेय महाविद्यालयीन कागदपत्रासह डेटा भरण्यासाठी शासनाने अधिकृत केलेल्या पोर्टलवर माहिती भरत आहेत. मात्र शासकीय वेबसाईट धड चालत नव्हती. शासनाने मुदतवाढ दिली चांगले केले. मात्र महाआयटी असताना अनेकदा घोटाळे केले. पुन्हा त्याच कंपनीवर फडणवीस यांचे एवढे प्रेम का?"