मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज (शनिवारी) ४ सप्टेंबरला ४१३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल (शुक्रवारी) राज्यात ९२ मृत्यूची नोंद झाली होती. आज त्यात किंचित घट होऊन ६४ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज २,५०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात ५२,०२५ सक्रिय रुग्ण -
राज्यात २,५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४१३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,७०७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४६ लाख ६० हजार ८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८२ हजार ११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २ हजार १९६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५०,०२५ सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा -चिमुकली एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरण; बी.पी. ठाकरे ब्लड बॅंक सील