महाराष्ट्र

maharashtra

दहावीच्या वाढीव 20 गुणांबाबत शिक्षण तज्ञांचे मत घेणार, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

पुढील वर्षी पुन्हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव २० गुण देण्याच्या निर्णयावर शिक्षण तज्ञांचे मत घेणार असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दहावीचे वाढीव २० गुण पुढील वर्षी देण्याचे आश्वासन दिले आहे.

By

Published : Jun 13, 2019, 9:00 PM IST

Published : Jun 13, 2019, 9:00 PM IST

विनोद तावडे

मुंबई - पुढील वर्षी पुन्हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव २० गुण देण्याच्या निर्णयावर शिक्षण तज्ञांचे मत घेणार असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दहावीचे वाढीव २० गुण पुढील वर्षी देण्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी यावर शिक्षण तज्ञांचे मत घेणार असल्याचे सांगितल्याने, मंत्रिमंडळातच ताळमेळ नसल्याचे उघड झाले.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने पुन्हा वाढीव २० मार्क देण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. ही मागणी घेऊन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र तोंडावर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळेच तावडेंना आज पत्रकार परिषद घ्यावी लागल्याची चर्चा आहे.

विनोद तावडे

यावेळी दहावीचा निकाल कमी लागला आहे. वाढीव २० गुण कमी केल्यामुळे टक्केवारी कमी झाल्याचे कारण पुढे आले आहे. हे वाढीव २० गुण पुढील वर्षीच्या शैक्षणिक कार्यकाळात पुन्हा देण्यात येतील, असे आश्वासन फडवणीस यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते. मात्र, निकाल लागला तेव्हा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी आम्ही टक्केवारीला लागलेली सूज कमी केली, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details